राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये एकसमानता असावी

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारी नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. मात्र विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याच्या पद्धतीनंमध्ये समानता नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्याच्या पद्धतीत एकसमानता असावी, वेळेवर निकाल लावावे या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


देशातील इतर सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी आणि परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे. यासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरूंना भेटून निवेदन दिली आहेत. आंदोलने केली आहेत. मात्र, तरीही काही विद्यापीठ वेगवेगळी भूमिका जाहीर करत असल्याने भ्रमाचे वातावरणामुळे ११ विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे, असे याचिकाकर्ते कल्पेश यादव आणि प्रा. बालुशा बाशल यांनी सांगितले.


प्रा. बालूशा बाशल यांनी सांगितले, की सर्व अकृषी विद्यापीठासह इतर विद्यापीठांचे कुलगुरू समवेत उच्च शिक्षण मंत्र्यानी परीक्षांचे नियोजना संदर्भात बैठक घेतली होती. परीक्षेचे नियोजन कसे करावे त्यातच परीक्षांमध्ये एकसमानता असणार, विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करुन देणार, परीक्षांचे नियोजन लवकर करुन निकाल वेळेवर लावणे यांसह इतर मुद्दयांवर या बैठकीमध्ये सर्व कुलगुरुंनी एकमताने ठराव मान्य करत परीक्षांचे नियोजन करण्याचे निश्चित झाले.


मात्र, वेळेवर निकाल प्रसिद्ध करण्याचे कारण पुढे करत नागपूर विद्यापीठासह इतर २ विद्यापीठांनी ऑफलाइन एमसीक्यू पद्धतीने परीक्षेचे नियोजन जाहीर केले आहे. मात्र, इतर विद्यापीठ हे ऑफलाइन पद्धतीने नियोजन करणार आहेत. अनेक विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आजपर्यंत प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करुन दिलेली नाही.

Comments
Add Comment

महायुतीच्या आमदारांना सामाजिक न्याय मंत्र्यांकडून प्रत्येकी २ कोटींचा विकासनिधी वाटप

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या

अल्पवयीन मुलींना दारू पाजल्याचा आरोप, अंधेरीतील 'हॉप्स किचन अँड बार'वर गुन्हा दाखल

मुंबई: अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील 'हॉप्स किचन अँड बार' या पबच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध

मुलुंड पश्चिम येथील पक्षीगृह बांधण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळेना...

मुंबई (खास प्रतिनिधी) : नाहूर, मुलुंड पश्चिम येथे मुंबई महापालिकेच्या वतीने पक्षीगृह उभारण्यात येणार असून या

दिवाळीनिमित्त मुंबई विमानतळावर रोषणाईची अनोखी सजावट

मुंबई: दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आकर्षक पद्धतीने उजळून

राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती

मुंबई : दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल

जगातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे तुम्हाला माहिती आहेत का? या यादीत भारत पिछाडीवर

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अनेक उद्योगपतींनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत त्यांच्या