चोरी केलेल्या पाच रिक्षा आणि मोटार सायकल पोलिसांकडून हस्तगत

  77

डोंबिवली : रिक्षा आणि मोटार सायकल चोरून त्या विकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका आरोपीस मानपाडा पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून एकूण ५ रिक्षा आणि ५ मोटार सायकल असा एकूण ५ लाख ३ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे.


डोंबिवली पूर्व विभाग कांचनगाव येथे वास्तव्य करणारा आकाश ढोणे (१९) असे आरोपीचे नाव आहे. मानपाडा पोलिसांतर्फे तयार करण्यात आलेल्या पथकांनी ज्या भागातून मोटार वाहने चोरी झालेली आहेत त्या भागात गस्त घालून संशयित इसमावर पाळत ठेवली होती. त्यानुसार संशयित आरोपी आकाश पोलिसांच्या नजरेस पडला.


चोरलेल्या रिक्षा व मोटारसायकली त्याने डोंबिवली पूर्व येथील निळजे गाव परिसरातील माऊली तलावाच्या बाजूस असलेल्या झाडाझुडपात तसेच डोंबिवली पूर्व परिसरातील खंबाळपाडा मॉडेल कॉलेजच्या मैदानातील झाडाझुडपात लपवून ठेवल्या असल्याचे कळून आले.


या सर्व रिक्षा व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे आणि मानपाडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या