राज्यात यापुढे सर्व परीक्षा ऑफलाइन

पुढच्या वर्षीपासून सीईटी, १२ वीच्या गुणांना मिळणार महत्व


मुंबई (प्रतिनिधी) : ‘ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा हा विद्यार्थ्यांचा सध्याचा सगळ्यात जवळचा प्रश्न आहे. आता आपल्याला ऑनलाइनकडून ऑफलाइनकडे जायचे आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील या निर्णयाला संमती दिली आहे. त्यामुळे आता यापुढे राज्यात ऑफलाइन परीक्षाच होणार’, अशी माहिती उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.


उदय सामंत म्हणाले, ‘ऑफलाइन परीक्षेदरम्यान विद्यार्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिली आहे. आपण अभ्यास कितपत करू शकतो, असा विद्यार्थांच्या मनात न्यूनगंड होता. त्यामुळे त्यांना परीक्षेआधी प्रश्नावली देण्याचा प्रयत्न केला आहे’.


कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. १२ वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची असते. त्यामुळे ते १२ वीच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करून सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीपासून आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेत आहोत. या आधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हा प्रयोग झालेला होता. आता हा प्रयोग पुन्हा करणार आहोत. मेरिटसाठी १२ वी आणि सीईटीचे ५० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. पुढच्या वर्षीपासून सीईटी आणि १२ वीच्या गुणांना महत्त्व देण्यात येणार आहे.


निकाल लवकर लावण्याकडे लक्ष...


आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे विद्यापीठांना सांगण्यात आले आहे. तसेच निकालदेखील लवकरात लवकर लागावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करणे आमची जबाबदारी आहे.


देशातील अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रम मराठीत सुरू केला आहे. इंजिनीअरिंगचा मराठी भाषेतला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे स्वीकारला आहे. पुढच्या वर्षी शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरला सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगतले.

Comments
Add Comment

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७