फायनल प्रवेशासाठी ‘रॉयल’ दंगल

अहमदाबाद (प्रतिनिधी) : शुक्रवारी क्वालिफायर २ मध्ये बंगळूरुची लढत राजस्थान रॉयल्सशी होणार आहे आणि या सामन्यातील विजेत्याची लढत रविवारी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी होईल. विजेता संघ अंतिम फेरीत, तर पराभूत संघ घरचा रस्ता धरेल. दोन्ही संघ या लढतीत फायनल प्रवेशासाठीच्या या ‘रॉयल’ दंगलीत विजयी होण्यासाठीच उतरतील.


रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला नशिबाच्या जोरावर प्लेऑफचे तिकीट मिळाले. पण या संघाने क्वालिफायर-२चा सामना जिंकून अहमदाबादचे तिकीट स्वतःहून मिळवले आहे. क्वालिफायर-२ मध्ये आता बंगळूरुची लढत शुक्रवारी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. पिंक आर्मीबद्दल सांगायचे, तर स्पर्धेच्या गट टप्प्यात त्यांनी बंगळूरुपेक्षा खूप चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत अंतिम फेरीचे तिकीट जिंकण्याचे आव्हान बंगळूरुसाठी सोपे असू शकत नाही. त्याचवेळी, पहिला क्वालिफायर हरल्यानंतर पुढे येत असलेल्या राजस्थानसाठी अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग तितकासा सोपा असणार नाही.


या मोसमात बंगळूरु केवळ मुंबई इंडियन्समुळेच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. पण क्वालिफायर-२ मध्ये त्यांनी स्वत:च्या दमदार कामगिरीच्या जोरावर मजल मारली आहे. जर राजस्थानला हरवून फायनल जिंकायची असेल, तर कर्णधार फाफ डू प्लेसिस ते विराट आणि मॅक्सवेलसारख्या खेळाडूंना आपले १०० टक्के योगदान द्यावे लागेल. सध्या बंगळूरुची गोलंदाजी चांगलीच मजबूत आहे. पण ऑरेंज कॅप होल्डर असलेल्या बटलरसारख्या फलंदाजांना रोखणे त्यांना फार कठीण जाईल.


दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे तर, हा संघ देखील अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आतुर असेल. लीग टप्प्यातील सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या आरआरसाठी ही शेवटची संधी असेल. कारण क्वालिफायर-१ मध्ये मिळालेल्या संधीचा फायदा पिंक आर्मीला करता आला नाही आणि संघाला पराभवाचा फटका बसला. गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून राजस्थानला थेट अंतिम फेरीत जाण्याची संधी होती. पण हे शक्य झाले नाही. मात्र शुक्रवारी संघाला मिळालेली ही दुसरी संधी आहे.


राजस्थान रॉयल्सला खरोखरच अंतिम फेरीचे तिकीट हवे असेल, तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. कर्णधार संजू सॅमसनला फलंदाजीत महत्त्वाचे योगदान द्यावे लागणार असून उर्वरित फलंदाजांनाही आपले सर्वोत्तम द्यावे लागेल. गेल्या सामन्यात संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची गोलंदाजी. त्यामुळे राजस्थानला नवीन रणनीती आणि तयारीसह बंगळूरुविरुद्ध उतरून त्यांचे विजयाचे उद्दिष्ट सार्थ करावे लागेल.


२००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. पण साखळी सामन्यांव्यतिरिक्त एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही संघांचा खेळ खेळण्याची वृत्ती आणि शैली पूर्णपणे वेगळी आहे. राजस्थानमध्ये, जिथे तरुण खेळाडू दर वर्षी आपले कौशल्य दाखवतात, तिथे बंगळूरुमध्ये सुरुवातीपासूनच स्टार खेळाडूंचा मेळा आहे. त्यामुळे ही लढत अधिकच रोमांचक होण्याची शक्यता आहे.


आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये आतापर्यंत २७ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी १३ सामने बंगळूरुने, तर राजस्थानने ११ सामने जिंकले आहेत. यादरम्यान ३ सामने अनिर्णित राहिले. दोन्ही संघांमधील विजयाचे अंतर खूपच कमी असून, यंदाची एकंदर कामगिरी बघता या मोसमात पिंक आर्मीचे पारडे जड दिसत आहे. गेल्या ७ वर्षांत पहिल्यांदाच बंगळूरु क्वालिफायर-२ खेळणार आहे. अशा स्थितीत अंतिम तिकीट जिंकण्याचे आव्हान रॉयलसाठी सोपे जाणार नाही. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीनंतरच दुसरा संघ अंतिम फेरीसाठी उपलब्ध होईल.


ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद वेळ : रात्री ७.३० वाजता

Comments
Add Comment

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Rohit Sharma : महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे डोळे पाणावले; 'त्या' भावूक क्षणाचा फोटो होतोय व्हायरल!

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) अखेर आपला पहिला वनडे वर्ल्ड कप (First ODI World Cup) जिंकून इतिहास रचला आहे.

भारताच्या मुलींची कमाल, वर्ल्डकप जिंकून केली धमाल; फक्त १० मुद्यात वाचा टीम इंडियाच्या विजयाची गोष्ट

नवी मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women World Cup 2025) जिंकला

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी