राणी बागेतील नव्या पाहुण्यांची पर्यटकांना भुरळ

सीमा दाते


मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सध्या नवीन पाहुणे आले आहेत. या पाहुण्यांमुळे राणी बागेत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या प्राण्यांना पाहण्यासाठी दररोज सरासरी १३ हजार पर्यटक उद्यानात येतात, तर सुट्ट्यांच्या दिवशी ही संख्या २५ हजारांच्या पुढे जात आहे. कोरोना काळात गेली दीड वर्षे राणी बाग बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर उद्यानात अनेक बदल करण्यात आले आहेत. पिंजरे, पाण्याची व्यवस्था, प्राणी आणि पक्ष्यांना विहार करण्यासाठी विशेष जागा तयार करण्यात आल्या आहेत.


सध्या उद्यानात शिवा नावाचा अस्वल आणि अर्जुन नावाचा बिबट्या व त्याची मादी या नव्या पाहुण्यांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. यापूर्वी सोमवार ते शुक्रवार सुमारे चार हजार पर्यटक राणीबाग पाहण्यासाठी येत होते. आता ही संख्या सरासरी १३ हजारांच्या वर गेली आहे. सध्या शनिवारी आणि रविवारी २५ हजारांहून अधिक पर्यटक उद्यानाला भेट देत आहेत. उद्यानामध्ये झालेले आधुनिक बदल आणि नवीन पाहुण्यांचे आगमन यामुळे पर्यटकांची संख्या वाढली असल्याची माहिती उद्यान अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.


उद्यानात नवीन प्राण्यांसोबत पेंग्विन, बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्या, वाघ पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. प्राण्यांसोबत पक्ष्यांसाठी देखील अत्याधुनिक पिंजरे उभारले आहेत. रॉयल बंगाल वाघांची जोडी आणि पेंग्विन्स पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.


प्राणिसंग्रहालयात एकूण १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी व ७ जातींचे ३२ सरपटणारे तसेच जलचर प्राणी असे एकूण २७३ प्राणी/पक्षी आहेत. विविध ३० प्रजातींचे सुमारे २५० पक्षी पर्यटकांना या ठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय २८६ प्रजातींचे सुमारे साडेतीन हजार झाडे, दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी अनेक वृक्षप्रेमी उद्यानात हजेरी लावतात. विशेषत: शनिवार व रविवारी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५