राणी बागेतील नव्या पाहुण्यांची पर्यटकांना भुरळ

  77

सीमा दाते


मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सध्या नवीन पाहुणे आले आहेत. या पाहुण्यांमुळे राणी बागेत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या प्राण्यांना पाहण्यासाठी दररोज सरासरी १३ हजार पर्यटक उद्यानात येतात, तर सुट्ट्यांच्या दिवशी ही संख्या २५ हजारांच्या पुढे जात आहे. कोरोना काळात गेली दीड वर्षे राणी बाग बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर उद्यानात अनेक बदल करण्यात आले आहेत. पिंजरे, पाण्याची व्यवस्था, प्राणी आणि पक्ष्यांना विहार करण्यासाठी विशेष जागा तयार करण्यात आल्या आहेत.


सध्या उद्यानात शिवा नावाचा अस्वल आणि अर्जुन नावाचा बिबट्या व त्याची मादी या नव्या पाहुण्यांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. यापूर्वी सोमवार ते शुक्रवार सुमारे चार हजार पर्यटक राणीबाग पाहण्यासाठी येत होते. आता ही संख्या सरासरी १३ हजारांच्या वर गेली आहे. सध्या शनिवारी आणि रविवारी २५ हजारांहून अधिक पर्यटक उद्यानाला भेट देत आहेत. उद्यानामध्ये झालेले आधुनिक बदल आणि नवीन पाहुण्यांचे आगमन यामुळे पर्यटकांची संख्या वाढली असल्याची माहिती उद्यान अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.


उद्यानात नवीन प्राण्यांसोबत पेंग्विन, बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्या, वाघ पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. प्राण्यांसोबत पक्ष्यांसाठी देखील अत्याधुनिक पिंजरे उभारले आहेत. रॉयल बंगाल वाघांची जोडी आणि पेंग्विन्स पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.


प्राणिसंग्रहालयात एकूण १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी व ७ जातींचे ३२ सरपटणारे तसेच जलचर प्राणी असे एकूण २७३ प्राणी/पक्षी आहेत. विविध ३० प्रजातींचे सुमारे २५० पक्षी पर्यटकांना या ठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय २८६ प्रजातींचे सुमारे साडेतीन हजार झाडे, दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी अनेक वृक्षप्रेमी उद्यानात हजेरी लावतात. विशेषत: शनिवार व रविवारी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.