कंत्राटदार करणार शिवाजी पार्कची देखभाल!

मुंबई (प्रतिनिधी) : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पहिल्यांदाच पालिकेने कंत्राटदार नेमला आहे. मैदानावर असलेली धूळ रोखण्यासाठी, पाणी मारण्यासाठी आणि मैदानातील हरितपट्टा राखण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.


दरम्यान मैदानातील धुळीमुळे परिसरातील स्थानिकांना त्रास होत होता. पावसाळ्यात मैदानात पाणी साचल्यामुळे खेळता येत नव्हते. या सगळ्याचा विचार करून पालिकेने मैदानाची देखभाल करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. यात कपूर ट्रेडिंग ही कंपनी पात्र ठरली आहे. अंदाजित रकमेपेक्षा उणे २१ टक्के दर या कंपनीने आकारला आहे, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून मैदान धूळमुक्त केले जाणार आहे. या मैदानात रेनवॉटरसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे.


गवताळ भाग तयार करण्यात आल्याने, येत्या एप्रिल आणि मेपर्यंत संपूर्ण शिवाजी पार्क मैदानातील गवत चांगल्या प्रकारे वाढले जाणार आहे. पार्काचे परिरक्षण आणि देखभाल करण्यासाठी या कंपनीला तीन वर्षांकरता हे कंत्राट देण्यात आले असून १२ माळी आणि १२ सफाई कामगार काम करणार आहेत. या कंत्राटात मैदानाला पाणी मारणे, पंप सुरू करणे तसेच मैदान परिसराची स्वच्छता राखण्यासह विविध कार्यक्रम व सभांच्या आयोजनानंतर तेथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर असेल.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक