भिवंडी, वाडा-मनोर महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

  131

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील नेहरोली व कंचाडजवळ बुधवारी झालेल्या दोन अपघातांत तिघांना जीव गमवावा लागला. भिवंडी-वाडा मार्गावर नेहरोली येथे रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे. तिथे एकेरी वाहतूक सुरू आहे. यावेळी विरुद्ध मार्गाने कुडूसहून येणाऱ्या ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीचालक मनीष परदेशी (वय,३०) हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.


दुसरा अपघात वाडा-मनोर महामार्गावरील कंचाड हद्दीतील फणसपाडा येथे घडला. मनोरच्या दिशेकडून कंचाडकडे येत असलेल्या दुचाकीवरील दोघांचा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी रस्तादुरुस्तीचे काम चालू आहे. याठिकाणी सावधानतेचे फलक, बॅरेकेट्स लावलेले नसल्याने दोघे तरुण रस्त्यावर पडल्यानंतर त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत योगेश सुभाष गोवारी (वय, २३), किरण यशवंत बाने (वय, २०) या दोघांचा मृत्यू झाला. अपघातास जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
Comments
Add Comment

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,