मुंबई (प्रतिनिधी) : आगामी पावसाळ्यात उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरळीत आणि विनाव्यत्यय सेवा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. मान्सूनचा सामना करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांपैकी दक्षिण-पूर्वेकडील घाट विभाग म्हणजेच कर्जत-लोणावळा विभाग आणि ईशान्येकडील म्हणजे कसारा-इगतपुरी विभागात विशेष भर देण्यात येत आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी कल्याण- लोणावळा विभागाची पाहणी केली आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व खबरदारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून रेल्वे सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय धावतील. त्यांनी घाट विभागातील मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आणि सांगितले की, रेल्वेचा घाट विभाग अनपेक्षित दरड कोसळण्याच्या आणि लँडस्लाइडच्या घटनांमुळे असुरक्षित आहे. ज्यामुळे सेवा विस्कळीत होऊ शकतात. कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीत, ही तत्परता भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर केलेले उपाय वाहतूक पूर्ववत करण्यास मदत करेल.
अशा कोणत्याही घटना रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणेच लँडस्लाइड होण्याच्या असुरक्षित ठिकाणी एकूण १४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आखली आहे. यापैकी ८७ सीसीटीव्ही कॅमेरे दक्षिण- पूर्व म्हणजे कर्जत-लोणावळा विभागातील १९ असुरक्षित ठिकाणी तर ५८ सीसीटीव्ही कॅमेरे ईशान्येकडील म्हणजे कसारा-इगतपुरी विभागात ११ संवेदनशील ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.
समर्पित आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे या सीसीटीव्हीचे २४x७ निरीक्षण केले जाईल. हे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या शिवाय घाट विभागात ५९४ नग बोल्डरचे स्कॅनिंग आणि ड्रॉपिंगचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…