आठ दिवसांपूर्वीच आयपीएल फायनलच्या सर्व तिकिटांची विक्री

  79

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या हंगामातील आयपीएलचा अंतिम सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार २९ मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याला एक आठवडा शिल्लक असतानाच या सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झाली आहे.


यंदा या सामन्याला एक लाखांहून अधिकजण उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सामन्याच्या वेळेसंदर्भात काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने महत्त्वाची माहिती दिली होती. २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणारा आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशीरा सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री ८ वाजता अंतिम सामना होणार आहे.


साडेसात वाजता नाणेफेक होईल. सध्या साडेसात वाजता आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होते. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे.


आयपीएलचा क्लोजिंग समारोप २९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम ५० मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल