आठ दिवसांपूर्वीच आयपीएल फायनलच्या सर्व तिकिटांची विक्री

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या हंगामातील आयपीएलचा अंतिम सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार २९ मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याला एक आठवडा शिल्लक असतानाच या सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झाली आहे.


यंदा या सामन्याला एक लाखांहून अधिकजण उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सामन्याच्या वेळेसंदर्भात काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने महत्त्वाची माहिती दिली होती. २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणारा आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशीरा सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री ८ वाजता अंतिम सामना होणार आहे.


साडेसात वाजता नाणेफेक होईल. सध्या साडेसात वाजता आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होते. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे.


आयपीएलचा क्लोजिंग समारोप २९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम ५० मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत