आठ दिवसांपूर्वीच आयपीएल फायनलच्या सर्व तिकिटांची विक्री

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या हंगामातील आयपीएलचा अंतिम सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार २९ मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याला एक आठवडा शिल्लक असतानाच या सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झाली आहे.


यंदा या सामन्याला एक लाखांहून अधिकजण उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सामन्याच्या वेळेसंदर्भात काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने महत्त्वाची माहिती दिली होती. २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणारा आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशीरा सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री ८ वाजता अंतिम सामना होणार आहे.


साडेसात वाजता नाणेफेक होईल. सध्या साडेसात वाजता आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होते. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे.


आयपीएलचा क्लोजिंग समारोप २९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम ५० मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

Comments
Add Comment

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ

हेटमायर आणि पॉवेलमुळे वेस्ट इंडिजने ओलांडला २५० धावांचा टप्पा

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

T20 World Cup 2026 Ind vs SA : आपण पॉवरप्लेमध्येच सामना गमावला - सूर्यकुमार यादव

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा ४३ वा सामना अहमदाबाद येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हा सामना