पंजाबचा विजयी शेवट

मुंबई (प्रतिनिधी) : हरप्रीत ब्ररची अप्रतिम गोलंदाजी आणि लिअम लिव्हींगस्टोनच्या फलंदाजीच्या धडाक्याने लीग टेबलमधील शेवटच्या सामन्यात पंजाबने हैदराबादला धूळ चारत हंगामाचा शेवट विजयाने केला. या विजयामुळे पंजाबने मोसमातील सातवा विजय मिळवला. हैदराबादने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजी आलेल्या पंजाबनेही सांघिक खेळाचे दर्शन घडविले. जॉनी बेअरस्टो, शिखर धवन यांना चांगली सलामी देण्यात यश आले. त्यामुळे पंजाबचा विजय सोपा झाला. पुढे लिअम लिव्हींगस्टोन धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला.


लिव्हींगस्टोनने २२ चेंडूंत नाबाद ४९ धावांची धडाकेबाज कामगिरी केली. पंजाबने अवघ्या १५.१ षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १६० धावांचे लक्ष्य गाठले. हैदराबादच्या एकाही गोलंदाजाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पंजाबने सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादला चांगली सुरुवात करता आली नसली तरी सलामीवीर अभिषेक शर्मासह त्रिपाठी, मारक्रम, वॉशिंग्टन सुंदर, रोमारीयो शेफर्ड यांच्या सांघिक खेळीमुळे संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. त्यात अभिषेक शर्माने संघातर्फे सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले.


त्रिपाठी, मारक्रम यांनी अनुक्रमे २०,२१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने २५ आणि रोमारीयो शेफर्डने नाबाद २६ धावांचे योगदान दिले. त्यामुळे हैदराबादला २० षटकांअखेर ८ फलंदाजांच्या बदल्यात १५७ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबच्या हरप्रीत ब्ररने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या २६ धावा देत ३ बळी मिळवले. नॅथन एलीसने ४ षटकांत ३ विकेट मिळवले, पण त्याला धावा रोखता आल्या नाहीत.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना