पंजाबचा विजयी शेवट

मुंबई (प्रतिनिधी) : हरप्रीत ब्ररची अप्रतिम गोलंदाजी आणि लिअम लिव्हींगस्टोनच्या फलंदाजीच्या धडाक्याने लीग टेबलमधील शेवटच्या सामन्यात पंजाबने हैदराबादला धूळ चारत हंगामाचा शेवट विजयाने केला. या विजयामुळे पंजाबने मोसमातील सातवा विजय मिळवला. हैदराबादने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजी आलेल्या पंजाबनेही सांघिक खेळाचे दर्शन घडविले. जॉनी बेअरस्टो, शिखर धवन यांना चांगली सलामी देण्यात यश आले. त्यामुळे पंजाबचा विजय सोपा झाला. पुढे लिअम लिव्हींगस्टोन धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला.


लिव्हींगस्टोनने २२ चेंडूंत नाबाद ४९ धावांची धडाकेबाज कामगिरी केली. पंजाबने अवघ्या १५.१ षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १६० धावांचे लक्ष्य गाठले. हैदराबादच्या एकाही गोलंदाजाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पंजाबने सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादला चांगली सुरुवात करता आली नसली तरी सलामीवीर अभिषेक शर्मासह त्रिपाठी, मारक्रम, वॉशिंग्टन सुंदर, रोमारीयो शेफर्ड यांच्या सांघिक खेळीमुळे संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. त्यात अभिषेक शर्माने संघातर्फे सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले.


त्रिपाठी, मारक्रम यांनी अनुक्रमे २०,२१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने २५ आणि रोमारीयो शेफर्डने नाबाद २६ धावांचे योगदान दिले. त्यामुळे हैदराबादला २० षटकांअखेर ८ फलंदाजांच्या बदल्यात १५७ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबच्या हरप्रीत ब्ररने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या २६ धावा देत ३ बळी मिळवले. नॅथन एलीसने ४ षटकांत ३ विकेट मिळवले, पण त्याला धावा रोखता आल्या नाहीत.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत