पंजाबचा विजयी शेवट

  33

मुंबई (प्रतिनिधी) : हरप्रीत ब्ररची अप्रतिम गोलंदाजी आणि लिअम लिव्हींगस्टोनच्या फलंदाजीच्या धडाक्याने लीग टेबलमधील शेवटच्या सामन्यात पंजाबने हैदराबादला धूळ चारत हंगामाचा शेवट विजयाने केला. या विजयामुळे पंजाबने मोसमातील सातवा विजय मिळवला. हैदराबादने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजी आलेल्या पंजाबनेही सांघिक खेळाचे दर्शन घडविले. जॉनी बेअरस्टो, शिखर धवन यांना चांगली सलामी देण्यात यश आले. त्यामुळे पंजाबचा विजय सोपा झाला. पुढे लिअम लिव्हींगस्टोन धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला.


लिव्हींगस्टोनने २२ चेंडूंत नाबाद ४९ धावांची धडाकेबाज कामगिरी केली. पंजाबने अवघ्या १५.१ षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १६० धावांचे लक्ष्य गाठले. हैदराबादच्या एकाही गोलंदाजाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पंजाबने सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादला चांगली सुरुवात करता आली नसली तरी सलामीवीर अभिषेक शर्मासह त्रिपाठी, मारक्रम, वॉशिंग्टन सुंदर, रोमारीयो शेफर्ड यांच्या सांघिक खेळीमुळे संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. त्यात अभिषेक शर्माने संघातर्फे सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले.


त्रिपाठी, मारक्रम यांनी अनुक्रमे २०,२१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने २५ आणि रोमारीयो शेफर्डने नाबाद २६ धावांचे योगदान दिले. त्यामुळे हैदराबादला २० षटकांअखेर ८ फलंदाजांच्या बदल्यात १५७ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबच्या हरप्रीत ब्ररने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या २६ धावा देत ३ बळी मिळवले. नॅथन एलीसने ४ षटकांत ३ विकेट मिळवले, पण त्याला धावा रोखता आल्या नाहीत.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट