३,२५४ विद्यार्थ्यांचे आर.टी. ई. प्रवेश निश्चित

मुंबई (प्रतिनिधी) : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रकियेअंतर्गत ऑनलाईन सोडत बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ रोजी काढण्यात आली होती.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ऑनलाईन लॉटरीनुसार निवड यादीतील विद्यार्थी संख्या ५ हजार ३४२ तर प्रतिक्षा यादीवरील विद्यार्थी संख्या ३ हजार ७८९ इतकी आहे. तर निवड यादीतील ५ हजार ३४२ बालकांपैकी ३ हजार २५४ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित झालेले आहेत. तर ५४ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरलेले असून २ हजार ०३४ पालकांनी पडताळणी समितीशी / शाळेशी संपर्क साधलेला नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांकरीता प्रवेशाची वाढीव मुदत यापूर्वीच म्हणजे दिनांक १० मे २०२२ रोजी संपुष्टात आलेली आहे.


शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या दिनांक १८ मे २०२२ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार, गुरुवार दिनांक १९ मे २०२२ रोजी दुपारी ३.०० नंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच दिनांक १९ मे २०२२ पासून प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस जाण्यास देखील सुरुवात झालेली आहे. तथापि, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता ‘RTE PORTAL’ वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे व या माहितीचा लाभ घ्यावा.


प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून ऍलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. हे ऍलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेवून विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी समितीकडे जाऊन पडताळणी समितीकडून दिनांक १९ मे २०२२ ते २७ मे २०२२ या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि शाळेमध्ये प्रवेश घ्यावा, असे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला