मुंबई (प्रतिनिधी) : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रकियेअंतर्गत ऑनलाईन सोडत बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ रोजी काढण्यात आली होती.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ऑनलाईन लॉटरीनुसार निवड यादीतील विद्यार्थी संख्या ५ हजार ३४२ तर प्रतिक्षा यादीवरील विद्यार्थी संख्या ३ हजार ७८९ इतकी आहे. तर निवड यादीतील ५ हजार ३४२ बालकांपैकी ३ हजार २५४ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित झालेले आहेत. तर ५४ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरलेले असून २ हजार ०३४ पालकांनी पडताळणी समितीशी / शाळेशी संपर्क साधलेला नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांकरीता प्रवेशाची वाढीव मुदत यापूर्वीच म्हणजे दिनांक १० मे २०२२ रोजी संपुष्टात आलेली आहे.
शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या दिनांक १८ मे २०२२ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार, गुरुवार दिनांक १९ मे २०२२ रोजी दुपारी ३.०० नंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच दिनांक १९ मे २०२२ पासून प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस जाण्यास देखील सुरुवात झालेली आहे. तथापि, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता ‘RTE PORTAL’ वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे व या माहितीचा लाभ घ्यावा.
प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून ऍलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. हे ऍलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेवून विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी समितीकडे जाऊन पडताळणी समितीकडून दिनांक १९ मे २०२२ ते २७ मे २०२२ या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि शाळेमध्ये प्रवेश घ्यावा, असे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…