पाण्यासाठी कारखानदार आक्रमक

डोंबिवली (वार्ताहर) : डोंबिवलीतील ४५० कारखान्यांना गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. एमआयडीसी डोंबिवली विभागीय कार्यालयावर गुरुवारी कारखानदारांनी कामा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. कारखान्यांना मुबलक पाणीपुरवठा करा, अन्यथा सर्व कारखान्यांच्या चाव्या आपल्या कार्यालयाच्या टेबलावर टाकू, असा इशारा संघटनेने दिला. दरम्यान लवकरच योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन कार्यकारी अभियंता आर. पी. पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.


डोंबिवली फेज-१ आणि फेज - २ मध्ये ४५० कारखाने आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून या सर्व कारखान्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कामा संघटनेने या समस्येसाठी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केले होते. त्याला उत्तर न मिळाल्याने अखेर जाब विचारण्यासाठी कारखानदारांनी कामा संघटनेच्या नेतृत्वात एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढून अभियंता आर. पी. पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.


कारखाने चालविण्यासाठी मुबलक पाणी मिळणे आवश्यक असते मात्र कमी दाबाने पाणी येत असल्याने कारखाने चालविणार तरी कसे असा प्रश्न आहे. पाणी लवकरात मिळाले नाही तर सर्व कारखान्यांच्या चाव्या आपल्या कार्यालयाच्या टेबलावर टाकू, असे कामा संघटनेचे अध्यक्ष डॉ. देवेन सोनी यांनी सांगितले. कारखानदार हेमंत भिडे म्हणाले, पाणी वितरण व्यवस्थेत समानता नसल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे.


याला जबाबदार कोण यापेक्षा सर्व माहिती कशी मिळेल याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. यावर कार्यकारी अभियंता पाटील यांनी एमआयडीसीचीच्या नवीन पाण्याच्या लाइनचे काम सुरू आहे. मध्यंतरी काही तांत्रिक अडचणीमुळे लाइनचे काम संथगतीने सुरू होते. मात्र आता कामाला गती मिळाली असून महिनाभरात हे काम पूर्ण होईल. त्यामुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होईल, असे सांगितले.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या