मेंढवण येथे गॅस टँकरला भीषण अपघात

कासा (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान गॅसचा टँकर पलटी झाल्याने गॅसची गळती झाली. मेंढवण खिंडीतील तीव्र उतारावर हा भीषण अपघात झाला. यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवली होती.


मुंबई वाहिनीवरून गुजरातकडे भरधाव गॅस टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पुढे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेंपोवर आदळून तो विरुद्ध दिशेला मुंबई-अहमदाबाद मार्गावर जाऊन पलटी झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस यंत्रणा दाखल झाली.


जखमीना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. टँकर पलटी होऊन महामार्गांवर मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागल्याने महामार्ग व पोलीस प्रशासन यांनी प्रसंगावधान राखत वाहतूक रोखली. काही तास महामार्ग बंद होता. दीड तासानंतर डहाणू अदानी कंपनीच्या अग्निशमन दलाने पाणी मारले. त्यानंतर वाहतूक सावकाश सुरू केली.


मेंढवण येथील याच वळणावर अनेक अपघात घडले आहेत. १९९२ साली टँकरच्या अपघातात ११३ जणांचा बळी गेला होता. महामार्गांवर अनेक अपघाती स्थळ असून अपघाताचे सत्र सुरूच आहे. यासाठी महामार्ग प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तीव्र वळणे, उड्डाणपूल, अवैध क्रॉसिंग, अपूर्ण सेवा रस्ते सुधारावे यासाठी नागरिक, वाहनचालक मागणी करीत आहेत.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील