भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी काही वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याच्या अनेक घटना समोर येत असून यात अनेकदा अपघात होऊन काहीजण जखमी देखील झाले आहेत.
वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सोनाली नाका, गोल्डन नेस्ट, सिल्व्हर पार्क अशा मुख्य ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात मीरा-भाईंदर शहरात मुख्य रस्त्यावर पहाटे ६.१५ च्या सुमारास गोल्डन नेस्टकडून काशिमिराच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक बसल्याने रिक्षाचा अपघात होऊन रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा पल्टी झाल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती.
अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत त्यामुळे वाहतूक कर्मचारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहेत.
वर्षभरात ५६४ वाहनचालकांचे समुपदेशन
काशिमिरा वाहतूक पोलीस मीरा-भाईंदर परिसरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. गेल्या वर्षभरापासून वाहतूक शाखेने हेल्मेट, सीट बेल्ट, उलट्या दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारचे कायदे तोडणाऱ्यांवर कायद्याच्या प्रति आदर वाटला पाहिजे, त्यांचबरोबर पुन्हा वाहन चालवताना कायद्या तोडू नये याकरिता वाहनचालकांचे ‘समुपदेशन’ करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात काशिमिरा वाहतूक पोलिसांनी ५६४ वाहनचालकांचे समुपदेशन केले आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…