विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई

  216

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी काही वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याच्या अनेक घटना समोर येत असून यात अनेकदा अपघात होऊन काहीजण जखमी देखील झाले आहेत.


वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सोनाली नाका, गोल्डन नेस्ट, सिल्व्हर पार्क अशा मुख्य ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात मीरा-भाईंदर शहरात मुख्य रस्त्यावर पहाटे ६.१५ च्या सुमारास गोल्डन नेस्टकडून काशिमिराच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक बसल्याने रिक्षाचा अपघात होऊन रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा पल्टी झाल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती.


अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत त्यामुळे वाहतूक कर्मचारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहेत.


वर्षभरात ५६४ वाहनचालकांचे समुपदेशन


काशिमिरा वाहतूक पोलीस मीरा-भाईंदर परिसरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. गेल्या वर्षभरापासून वाहतूक शाखेने हेल्मेट, सीट बेल्ट, उलट्या दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारचे कायदे तोडणाऱ्यांवर कायद्याच्या प्रति आदर वाटला पाहिजे, त्यांचबरोबर पुन्हा वाहन चालवताना कायद्या तोडू नये याकरिता वाहनचालकांचे ‘समुपदेशन’ करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात काशिमिरा वाहतूक पोलिसांनी ५६४ वाहनचालकांचे समुपदेशन केले आहे.

Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,