विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी काही वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याच्या अनेक घटना समोर येत असून यात अनेकदा अपघात होऊन काहीजण जखमी देखील झाले आहेत.


वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सोनाली नाका, गोल्डन नेस्ट, सिल्व्हर पार्क अशा मुख्य ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात मीरा-भाईंदर शहरात मुख्य रस्त्यावर पहाटे ६.१५ च्या सुमारास गोल्डन नेस्टकडून काशिमिराच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक बसल्याने रिक्षाचा अपघात होऊन रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा पल्टी झाल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती.


अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत त्यामुळे वाहतूक कर्मचारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहेत.


वर्षभरात ५६४ वाहनचालकांचे समुपदेशन


काशिमिरा वाहतूक पोलीस मीरा-भाईंदर परिसरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. गेल्या वर्षभरापासून वाहतूक शाखेने हेल्मेट, सीट बेल्ट, उलट्या दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारचे कायदे तोडणाऱ्यांवर कायद्याच्या प्रति आदर वाटला पाहिजे, त्यांचबरोबर पुन्हा वाहन चालवताना कायद्या तोडू नये याकरिता वाहनचालकांचे ‘समुपदेशन’ करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात काशिमिरा वाहतूक पोलिसांनी ५६४ वाहनचालकांचे समुपदेशन केले आहे.

Comments
Add Comment

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना

एक हजार रुपयांच्या मोबदल्यात ६ वर्षाच्या बालकाला जुंपले कामाला !

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुलांचे बालमजुरीसाठी शोषण आजही सुरुच पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी