हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य सांगा

Share

मनसे नेते अखिल चित्रे यांचे दीपाली सय्यद यांना खुले आव्हान

मुंबई : “तुम्हाला काय उत्तर द्यायचे? म्हणून आम्ही तुम्हाला इतके दिवस वाईड बॉल म्हणून उत्तर देत नव्हतो. इतके तर सरडाही रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावे बदलता. आप ते शिवसंग्राम ते शिवसेना हा तुमचा विचार बदलत आणि नाव बदलत झालेला प्रवास आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही उत्तर द्याल” अशा शब्दांत मनसे नेते अखिल चित्रे य़ांनी दीपाली सय्यद यांना जाहीर आव्हान दिले आहे.

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केल्यानंतर आता मनसेने दीपाली सय्यद यांना खुले आव्हान दिले आहे. “पावसाचे कारण देऊन मैदान सोडले. भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले. अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले” असे ट्विट दीपाली यांनी केले आहे. यानंतर आता मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे. “अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचे नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही” असे म्हणत मनसे नेते अखिल चित्रे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

अखिल चित्रे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही स्क्रिनशॉट शेअर करत ट्विट केले आहे. तसेच “तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचे रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा” असे ही अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.

“अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचे नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही. २०१४ साली अहमदनगरमधून निवडणूक लढवली, तर नाव दीपाली सय्यद. २०१९ ला शिवसेनेकडून मुंब्रा-कळव्यातून निवडणूक लढवली, तर नाव सोफिया जहांगीर सय्यद. शिवसेनेत आणि शिवसंग्राममध्ये असताना प्रचारासाठी नाव दीपाली भोसले सय्यद. वारंवार राजकारणासाठी स्वत:चे नाव बदलणाऱ्या तुम्ही. तुम्हाला अवसरवादी नेत्या म्हणावे लागेल. तुम्ही इतरांना नावे ठेवता?” असे अखिल चित्रे यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

Recent Posts

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

43 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, पाकिस्तान पडणार कोरडाठाक

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…

1 hour ago

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

2 hours ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

2 hours ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

2 hours ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

3 hours ago