रस्ते होणार कधी

पूल बांधला, पण उपयोग काय, सार्वजनिक बांधकामाचे दुर्लक्ष


नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील चिल्लार नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला शासनाने येण्या-जाण्यासाठी रस्ता बनविलेला नाही. त्यामुळे एक कोटी रुपये खर्चून पूल बांधला, मात्र त्या पुलाचा काहीही उपयोग दोन्ही बाजूने जोडणारे रस्ते बनविले नसल्याने होत नाही. दरम्यान, या पुलालाल जोडणाऱ्या रस्त्याचे काम शासनाने करावे आणि वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


चिल्लार नदीवर पूल नव्हता त्यावेळी पिंपळोली, कोलिवली तसेच त्या भागातील लोक पावसाळ्यात नदी पार करण्यासाठी होडीचा वापर करीत होते. वर्षानुवर्षे पिंपळोली - कोलिवली दरम्यान होडीवरून पावसाळ्यात चार महिने प्रवास सुरु होता. मात्र ऑगस्ट २००७ मध्ये पिंपळोली गावातील महिलांना घेऊन चाललेली होडी कलंडली आणि त्यामध्ये दहा जण वाहून गेले होते. त्या होडी दुर्घटनेत नऊ महिलांना जलसमाधी मिळाली होती. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळी आल्यानंतर चिल्लार नदीवर पूल बांधण्यात येईल असे जाहीर केले. त्यानंतर दीड वर्षांत त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती झाली आणि जानेवारी २०११ पासून चिल्लार नदी पार करण्यासाठी पुलाचा उपयोग सुरु झाला.


त्यावेळी कोलिवली येथे नेरळ - कशेळे रस्ता जोडणारा रस्ता तसेच नेरळ-गुडवण असा पिंपळोली गावाला जोडणारा रस्ता बनविण्यात येणार होता. मात्र आजतागात त्या रस्त्यावर ना खडी टाकली ना डांबर. पुलावरून लोकांची ये-जा सुरू होऊन आज १० वर्षे लोटली. कोलिवली तसेच पिंपळोली गावाला जोडणारा रस्ता शासनाने बनवून दिला नाही. त्यामुळे एक कोटी रुपये खर्चून बांधलेल्या पुलाचा फायदा काय? असा प्रश्न स्थानिक कार्यकर्ते आणि होडी दुर्घटनेत आपले वडील गमावलेले हरेश सोनावळे या तरुणाने केला आहे. हरेश सोनावळे यांनी दोन्ही बाजूचा रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करून व्हावा यासाठी अनके वर्षे प्रयत्न केला आहे.


मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्या रस्त्याकडे पाहायला तयार नाही. कोलिवली येथून चिल्लार नदीवरील पूल ते नेरळ- गुडवण रस्त्याला जोडणारा रस्ता तयार झाल्यास पुलाचा उपयोग पर्यायी रस्ता म्हणून होऊ शकतो. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची निर्मिती केली, मात्र १० वर्षात त्या पुलाच्या दोन्ही बाजू जोडणारे रस्ते आजपर्यंत केले नाहीत. रस्ता व्हावा आणि वाहतूक सुरु व्हावी यासाठी पिंपळोली, कोलिवली ग्रामस्थ यांच्यासाठी हा पूल महत्वाचा असून शासन त्याकडे लक्ष देणार आहे काय? असा प्रश्न हरेश सोनावळेने शासनाला विचारला आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग