नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी जी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी दिले. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी पेरारिवलन याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
पेरारिवलन ३० वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत स्पष्टपणे म्हटले होते की, जर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्ही त्याची सुटका करू. त्याच प्रमाणे आज न्यायालयाने पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिले.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणातील अन्य आरोपी निलिनी श्रीहरन, मरुगन आणि श्रीलंकन नागरिकासह अन्य ६ आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजीव गांधींच्या हत्येप्रकरणात ७ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा जन्मठेपेत बदलली.
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…