हैदराबादचा निसटता विजय

  81

मुंबई (प्रतिनिधी) : रोहित शर्मा, इशन किशनची धडाकेबाज सलामी आणि टीम डेविडच्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबईचा संघ हैदराबादविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र लयीत असलेला डेविड चुकीच्या वेळी धावचित झाल्याने मुंबईला पराभवाची चव चाखावी लागली. हैदराबादने हा सामना अवघ्या ३ धावांनी जिंकत गुणफलक वाढविले. राहुल त्रिपाठीची फलंदाजी आणि उम्रान मलिक, भुवनेश्वर कुमार यांची गोलंदाजी हैदराबादच्या विजयात मोलाची ठरली.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या मुंबईने दणक्यात सुरुवात केली. रोहित शर्मा आणि इशन किशन चांगलेच लयीत होते. दोन्ही सलामीवीरांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा यथेच्छ सामना केला. त्यामुळे मुंबईने नाबाद अर्धशतक झळकावले. मुंबईचे धावसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना रोहित शर्माच्या रुपाने हैदराबादने पहिला बळी मिळवला. वॉशिंग्टन सुंदरने हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर इशन किशनही फार काळ थांबला नाही. रोहितपाठोपाठ किशनही माघारी परतला. येथे हैदराबादच्या मदतीला वेगाचा बादशहा उम्रान मलिक धाऊन आला. मलिकने गर्गकरवी झेलबाद करत किशनला पॅवेलियनचा रस्ता दाखवला. रोहित आणि किशन दोघांसाठीही नशीबाने किंचीतशी मान वळवली. दोघेही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना बाद झाले. रोहितने ४८ तर किशनने ४३ धावांची कामगिरी केली. दोन्ही धडाकेबाज फलंदाज बाद झाल्यानंतर मुंबईच्या धावगतीचा वेग मंदावला.


डॅनियल सॅम्स आणि युवा खेळाडू तिलक वर्मा फार काळ मैदानात थांबले नाहीत. त्यानंतर टीम डेविडने फलंदाजीची सूत्रे हाती घेत हैदराबादच्या गोलंदाजांना तारे दाखवले. टी नटराजनच्या एका षटकात सलग तीन षटकार ठोकत टीम डेविडने मुंबईला विजयासमीप नेले. पण त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डेविड धावचित झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. टीम डेविडने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर १८ चेंडूंत ४६ धावांची तुफानी फलंदाजी केली. तळात रमणदीप सिंगने ६ चेंडूंत १४ धावा करत सामन्याचा रोमांच वाढवला. त्यामुळे विजयासमीप आलेल्या मुंबईच्या घशातून हैदराबादने विजयाचा घास हिरावून घेतला. हैदराबादने ३ धावांनी सामना जिंकला. हैदराबादच्या उम्रान मलिकने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने ३ षटकांत २४ धावा देत ३ बळी मिळवले.


तत्पूर्वी सलामीवीर प्रियम गर्गसह राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन या मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे हैदराबादने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १९३ धावांचा डोंगर उभारला. प्रियम गर्गने २६ चेंडूंत ४२ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने ४४ चेंडूंत ७६ धावांचे योगदान दिले, तर निकोलस पूरनने २२ चेंडूंत ३८ धावा केल्या. मुंबईचा रमणदीप सिंग सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ षटकांमध्ये अवघ्या २० धावा देत ३ बळी मिळवले. मुंबईचे अन्य फलंदाज महागडे ठरले. त्यातल्या त्यात जसप्रीत बुमराने बरी गोलंदाजी केली. ४ षटकांत ३२ धावा देत १ बळी मिळवला.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे