मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेच्या प्रतिष्ठित मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने १७ मे १९७२ रोजी आपल्या पहिल्या प्रवासाला ५० गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या स्मरणार्थ, पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि ट्रेनला मोठ्या उत्साहात आणि उत्सवात हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या प्रसंगी एक विशेष पोस्टल कव्हर आणि व्हीआयपी अल्बम देखील प्रसिद्ध करण्यात आला.
प्रमुख मुख्य आयुक्त, मुंबई सीजीएसटी अशोक कुमार मेहता या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते आणि मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल वीणा आर. श्रीनिवास यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी मुंबई मध्य विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी. व्ही. एल. सत्यकुमार आदी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने १७ मे १९७२ रोजी मुंबई सेंट्रल स्थानकावरून (तत्कालीन बॉम्बे सेंट्रल) राष्ट्रीय राजधानीकडे आपला उद्घाटन प्रवास केला. या ट्रेनने देशाच्या सेवेत ५० गौरवशाली वर्षे पूर्ण केली असून त्यानिमित्ताने ही प्रतिष्ठित ट्रेन निघण्यापूर्वी मुंबई सेंट्रल स्थानकावर एका दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई मध्य विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी. व्ही. एल. सत्यकुमार यांनी या महत्त्वाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे, विशेष पाहुणे व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. विशेष पोस्टल कव्हर आणि व्हीआयपी अल्बमचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. यानंतर रोटरॅक्ट क्लब ऑफ एच.आर. कॉलेजच्या सदस्यांनी फ्लॅश मॉब स्किट सादर केले.
पश्चिम रेल्वेचे दोन सेवानिवृत्त कर्मचारी आणि या प्रतिष्ठित ट्रेनमध्ये कार्यरत असलेल्या सध्याच्या कर्मचाऱ्याने त्यांचे संस्मरणीय अनुभव सांगितले. प्रवाशांना स्मृतीचिन्ह व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. राजधानी एक्स्प्रेसच्या पहिल्या रेल्वे सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी ९० वर्षीय कमरुझ्झमान सारंग हे देखील या ऐतिहासिक दिवशी या ट्रेनमधून प्रवास करत आहेत.
मुंबई राजधानी एक्सप्रेस ही गाडी भारतीय रेल्वेच्या भात्यातील एक अतिजलद गाडी म्हणून ओळखली जाते. १७ मे १९७२ रोजी सुरु करण्यात आलेली ही गाडी ताशी ८८ किलोमीटरच्या वेगाने वाऱ्याशी स्पर्धा करते. ही गाडी सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच लोकप्रिय तर झालीच पण आत्ताही ५० वर्षांनंतरसुद्धा गाडीने आपली लोकप्रियता आणि दर्जा कायम राखण्यात यश मिळवले आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…