नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघातील खेळाडू सुनील गावस्कर यांनी थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेतील भारताला मिळालेल्या विजेतेपदाची तुलना १९८३ मधील क्रिकेट विश्वचषक विजयाशी केली आहे. हा क्षण १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या वेळेसारखा होता. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाच्या यशाने देशात बॅडमिंटनमध्ये क्रांती होणार असल्याचेही गावस्कर म्हणाले.
भारताने रविवारी थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. हा क्षण १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकासारखा होता. १९८३ मध्ये भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात क्रिकेट युगाचे सुरुवात झाली. दरम्यान भारताने रविवारी थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे आता भारतात बॅडमिंटन युगाची सुरुवात होणार आहे. भारत बॅडमिंटनमध्येही आपले वर्चस्व प्रस्थापित करणार असल्याचे गावस्कर म्हणाले.
बॅडमिंटन माझा आवडीचा खेळ आहे. जर एकाचवेळी टी-२० आणि बॅडमिंटनचा सामना असेल तर मी बॅडमिंटनचा सामना पाहायला पसंती देतो. बॅडमिंटन खेळ कठीण आहे. या खेळात आपल्या पायांमध्ये ताकद लागत असून आपल्यात धाडस आणि शारीरिक लवचिकता गरजेची असते.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…