राज्यातील आदर्श शाळांचा चेहरामोहरा बदलणार

  111

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ४८८ शाळांच्या विकासासाठी राज्य शिक्षण विभागाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आले असून आदर्श शाळा म्हणून या शाळांना बांधकाम तसेच नूतनीकरणासाठी संबधित निधी देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांना नव संजीवनी मिळणार असून शाळांचे चेहरामोहरा बदलणार आहे.


चांगली शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या शाळांची निवड करण्यात येते आणि त्यानुसार त्यांना अत्याधुनिक करण्यासाठी निधी पुरविण्यात येतो. त्यानुसार यंदा ४८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. संबधित निधी शिक्षण आयुक्त, समग्र शिक्षा अभियान, यांच्यावतीने मंजूर करण्यात येतो.


यामध्ये पालघरमधील ५ शाळा, रायगड मधील १५, रत्नागिरी १०, सिंधुदुर्ग १० आणि ठाणे ग्रामीण भागातील ५ शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांना शिक्षण विभागाकडून नवीन बांधकाम, नूतनीकरण यासाठी मोठा निधी देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची