राज्यातील आदर्श शाळांचा चेहरामोहरा बदलणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ४८८ शाळांच्या विकासासाठी राज्य शिक्षण विभागाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आले असून आदर्श शाळा म्हणून या शाळांना बांधकाम तसेच नूतनीकरणासाठी संबधित निधी देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांना नव संजीवनी मिळणार असून शाळांचे चेहरामोहरा बदलणार आहे.


चांगली शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या शाळांची निवड करण्यात येते आणि त्यानुसार त्यांना अत्याधुनिक करण्यासाठी निधी पुरविण्यात येतो. त्यानुसार यंदा ४८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. संबधित निधी शिक्षण आयुक्त, समग्र शिक्षा अभियान, यांच्यावतीने मंजूर करण्यात येतो.


यामध्ये पालघरमधील ५ शाळा, रायगड मधील १५, रत्नागिरी १०, सिंधुदुर्ग १० आणि ठाणे ग्रामीण भागातील ५ शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांना शिक्षण विभागाकडून नवीन बांधकाम, नूतनीकरण यासाठी मोठा निधी देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.