राज्यातील आदर्श शाळांचा चेहरामोहरा बदलणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ४८८ शाळांच्या विकासासाठी राज्य शिक्षण विभागाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आले असून आदर्श शाळा म्हणून या शाळांना बांधकाम तसेच नूतनीकरणासाठी संबधित निधी देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांना नव संजीवनी मिळणार असून शाळांचे चेहरामोहरा बदलणार आहे.


चांगली शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या शाळांची निवड करण्यात येते आणि त्यानुसार त्यांना अत्याधुनिक करण्यासाठी निधी पुरविण्यात येतो. त्यानुसार यंदा ४८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. संबधित निधी शिक्षण आयुक्त, समग्र शिक्षा अभियान, यांच्यावतीने मंजूर करण्यात येतो.


यामध्ये पालघरमधील ५ शाळा, रायगड मधील १५, रत्नागिरी १०, सिंधुदुर्ग १० आणि ठाणे ग्रामीण भागातील ५ शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांना शिक्षण विभागाकडून नवीन बांधकाम, नूतनीकरण यासाठी मोठा निधी देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक