एसी लोकलला प्रवाशांची पसंती

  94

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी वातानुकूलित उपनगरीय लोकलला चांगला प्रतिसाद दिला आहे. वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी महिन्यात दररोज सरासरी ५,९३९ प्रवाशांवरून मे महिन्यात दररोज सरासरी २६,८१५ प्रवासी इतकी वाढली आहे.


मध्य रेल्वे वातानुकूलित लोकलसह एकूण १८१० उपनगरीय सेवा चालवते, तर १४ एप्रिलपासून मेन लाइनवर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण/टिटवाळा/अंबरनाथ) १२ वातानुकूलित सेवा वाढल्याने मेन लाइनवरील एकूण वातानुकूलित सेवा (आठवड्याच्या दिवशी) ४४ वरून ५६ पर्यंत वाढल्या आहेत. आता टिटवाळा आणि अंबरनाथ मार्गावरील प्रवासी गर्दीच्या वेळेत (पीक अवर्समध्ये) वातानुकूलित सेवेचाही लाभ घेता येईल. मध्य रेल्वेने रविवारी आणि नामनिर्देशित सुट्टीच्या दिवशी १४ अतिरिक्त वातानुकूलित सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


तर ५ मेपासून रेल्वेने एकेरी प्रवासाच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर वातानुकूलित लोकलला मिळणारा प्रतिसाद प्रचंड वाढला आहे. ३४ किलोमीटर अंतरासाठी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे) प्रति व्यक्ती एका प्रवासाचे भाडे रु. ९५/- आहे आणि ५४ किलोमीटर अंतरासाठी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण) रु. १०५/- आहे.


दरम्यान आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ८,१७१ तिकिटे, डोंबिवली - ७,५३४ तिकिटे, कल्याण - ६,१४८ तिकिटे, ठाणे - ५,८८७ तिकिटे, घाटकोपर - ३,६९८ तिकिटांची विक्री झाली आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर