मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी वातानुकूलित उपनगरीय लोकलला चांगला प्रतिसाद दिला आहे. वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी महिन्यात दररोज सरासरी ५,९३९ प्रवाशांवरून मे महिन्यात दररोज सरासरी २६,८१५ प्रवासी इतकी वाढली आहे.
मध्य रेल्वे वातानुकूलित लोकलसह एकूण १८१० उपनगरीय सेवा चालवते, तर १४ एप्रिलपासून मेन लाइनवर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण/टिटवाळा/अंबरनाथ) १२ वातानुकूलित सेवा वाढल्याने मेन लाइनवरील एकूण वातानुकूलित सेवा (आठवड्याच्या दिवशी) ४४ वरून ५६ पर्यंत वाढल्या आहेत. आता टिटवाळा आणि अंबरनाथ मार्गावरील प्रवासी गर्दीच्या वेळेत (पीक अवर्समध्ये) वातानुकूलित सेवेचाही लाभ घेता येईल. मध्य रेल्वेने रविवारी आणि नामनिर्देशित सुट्टीच्या दिवशी १४ अतिरिक्त वातानुकूलित सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तर ५ मेपासून रेल्वेने एकेरी प्रवासाच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर वातानुकूलित लोकलला मिळणारा प्रतिसाद प्रचंड वाढला आहे. ३४ किलोमीटर अंतरासाठी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे) प्रति व्यक्ती एका प्रवासाचे भाडे रु. ९५/- आहे आणि ५४ किलोमीटर अंतरासाठी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण) रु. १०५/- आहे.
दरम्यान आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ८,१७१ तिकिटे, डोंबिवली – ७,५३४ तिकिटे, कल्याण – ६,१४८ तिकिटे, ठाणे – ५,८८७ तिकिटे, घाटकोपर – ३,६९८ तिकिटांची विक्री झाली आहे.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…