आयएनएस सुरत, उदयगिरी युद्धनौकांचे जलावतरण

  82

मुंबई (प्रतिनिधी) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आयएनएस ‘सुरत’ आणि आयएनएस ‘उदयगिरी’ या युद्धनौकांचे आज जलावतरण करण्यात आले. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या या दोन युद्धनौकांचे जलावतरण माजगाव डॉक येथे पार पडले. यावेळी नेवल चीफ हरि कुमार, व्हाइस अॅडमिरल चीफ ए व्ही. सिंग, खासदार अरविंद सावंत, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशीष शेलार, आमदार यामिनी जाधव आणि शिवसेना नेते सचिन अहिर हे उपस्थित होते.


या दोन्ही युद्धनौकांची भर पडल्यामुळे देशाची समुद्री क्षमता वाढली आहे. स्वदेशी बनावटीच्या भारतीय नौदलाच्या ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ या दोन युद्धनौका मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे बांधण्यात आल्या. भारतीय नौदलाची १५ बी श्रेणीची ‘सुरत’ ही युद्धनौका प्रगत श्रेणीची असून ती मार्गदर्शित क्षेपणास्त्रे नष्ट करण्यास सक्षम आहे. दुसरी ‘१७ ए’ फ्रिगेट्स प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या युद्धनौकेचे नाव ‘उदयगिरी’ या आंध्र प्रदेशातील रेंजवर ठेवण्यात आले आहे. ही युद्धनौका सर्वोत्तम उपकरणे, प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहे.पी ‘१७ ए’ प्रकल्पांतर्गत एकूण सात जहाजांचे बांधकाम सुरू आहे. गुजरात राज्याची व्यावसायिक राजधानी आणि मुंबईनंतर पश्चिम भारतातील दुसरे सर्वात मोठे व्यावसायिक केंद्र म्हणून ‘सुरत’हे नाव देण्यात आले आहे, तर आंध्र प्रदेशातील एका पर्वतराजीच्या नावावरून ‘उदयगिरी’ हे नाव देण्यात आले आहे.


या कार्यक्रमादरम्यान बोलताना राज्याचे संरक्षण मंत्री यांनी भारताचा प्राचीन नौदलाचा इतिहासही उलगडला. वास्को-द-गामा या खलाशांनी लावलेल्या शोधात त्याचे मार्गदर्शन काझी मलाम यांनी केले होते, हे त्यांनी आपल्या भाषणातून आवर्जून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कानोजी आंग्रे यांनी तयार केले. कान्होजी आंग्रे हे चाणाक्ष ॲडमिरल होते. येणाऱ्या काळात भारत केवळ देशासाठीच नाही तर जगासाठी जहाजबांधणी करेल.

Comments
Add Comment

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा