सीएसएमटी स्थानकातील फलाटांचा होणार विस्तार

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ही दोन महत्त्वाची टर्मिनस आहेत. सीएसएमटी स्थानकातून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून फक्त लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. सीएसएमटी स्थानकातून दररोज सुमारे ९० लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्यात येतात. १०,११ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून १३ डब्यांच्या तर १२ आणि १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून १७ डब्यांच्या गाड्या धावतात. तर १४ ते १८ क्रमांकावरून २४ डब्यांच्या मेल-एक्सप्रेस धावतात. १० ते १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्याकरिता या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.


विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गाडीला आणखी सात डबे जोडता येतील. या चार प्लॅटफॉर्मवरून रोज १० गाड्यांच्या फेऱ्या होऊ शकतील. एका डब्यातील आसनक्षमता ७० धरली तरी रोज ४९०० प्रवाशांना याचा थेट फायदा होईल. तसेच वेटिंग लिस्ट कमी होईल. प्रवासी वाढल्याने रेल्वेच्या महसूलात देखील वाढ होणार आहे. या चार प्लॅटफॉर्मटचा विस्तार करण्याचे काम मंजूर झाले आहे. यासाठी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. हे काम नुकतेच सुरू केले आहे. या कामाचा पहिला टप्पा मार्च २०२३ आणि दुसरा टप्पा मार्च २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.


दिवसेंदिवस मुंबईत वाढणारी गर्दी आणि प्रवासी संख्या पाहता २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सीएसएमटी स्थानकातील लांब पल्याच्या चार प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात प्लॅटफॉर्म क्रमांक १० ते १३ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. यामुळे दररोज सुमारे ५ हजार जादा प्रवासी प्रवास करू शकतील.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.