सीएसएमटी स्थानकातील फलाटांचा होणार विस्तार

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ही दोन महत्त्वाची टर्मिनस आहेत. सीएसएमटी स्थानकातून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून फक्त लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. सीएसएमटी स्थानकातून दररोज सुमारे ९० लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्यात येतात. १०,११ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून १३ डब्यांच्या तर १२ आणि १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून १७ डब्यांच्या गाड्या धावतात. तर १४ ते १८ क्रमांकावरून २४ डब्यांच्या मेल-एक्सप्रेस धावतात. १० ते १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्याकरिता या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.


विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गाडीला आणखी सात डबे जोडता येतील. या चार प्लॅटफॉर्मवरून रोज १० गाड्यांच्या फेऱ्या होऊ शकतील. एका डब्यातील आसनक्षमता ७० धरली तरी रोज ४९०० प्रवाशांना याचा थेट फायदा होईल. तसेच वेटिंग लिस्ट कमी होईल. प्रवासी वाढल्याने रेल्वेच्या महसूलात देखील वाढ होणार आहे. या चार प्लॅटफॉर्मटचा विस्तार करण्याचे काम मंजूर झाले आहे. यासाठी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. हे काम नुकतेच सुरू केले आहे. या कामाचा पहिला टप्पा मार्च २०२३ आणि दुसरा टप्पा मार्च २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.


दिवसेंदिवस मुंबईत वाढणारी गर्दी आणि प्रवासी संख्या पाहता २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सीएसएमटी स्थानकातील लांब पल्याच्या चार प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात प्लॅटफॉर्म क्रमांक १० ते १३ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. यामुळे दररोज सुमारे ५ हजार जादा प्रवासी प्रवास करू शकतील.

Comments
Add Comment

Maharani Tararani : महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या

आचार्य नयन पद्मसागर यांचे वादग्रस्त विधान; मराठी भाषेची रचना देखील जैन आचार्यने केल्याचा दावा मुंबई : छत्रपती

सोशल मीडियावर ओळख अन् शाळेतून पळवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नागपूर : सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखी या अत्यंत भयानक रूप घेऊ शकतात, याचा प्रत्यय या नागपूरच्या घटनेमधून स्पष्ट

अश्विनी भिडे यांच्याकडे मेट्रोचा कार्यभार कायम

 लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव; प्रेरणा देशभ्रतार मत्स्यव्यवसाय आयुक्तपदी, तुकाराम

पॅनकार्डच्या नियमांमध्ये बदल, १ एप्रिलपासून 'हे' नवे नियम होणार लागू

मुंबई : भारताचे आर्थिक वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते. उद्यापासून नव आर्थिक वर्ष सुरु होतंय. आणि

Mumbai Local Mega block Update : मुंबईत अचानक 'इतक्या' लोकल फेऱ्या झाल्या रद्द, आता शेवटचीही गाडी सुटणार 'या' वेळेवर

मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या

माजी खासदार राहुल शेवाळे बॉक्सिंगच्या रिंगणात; महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई: बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) च्या निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या