Categories: पालघर

बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत मात्र खेळ आरोग्याशी

Share

कासा (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्येसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात बाटलीबंद पाण्याला ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी, हा व्यवसाय तेजीत आहे. असे असले तरी शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ पाणी थंड करून विकण्याचा सपाटा काही व्यावसायिकांकडून सुरू आहे. पाणी शुद्ध केले जाते की नाही, पण बक्कळ पैसा कमावण्याच्या बाटलीबंद हव्यासापोटी अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होत आहे. पाण्याच्या बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. अनेक कंपनीचे पाणी मिनरल असते. तर, काही कंपन्या पॅकेजच्या नावाखाली बाटलीबंद पाणी विक्री करीत आहेत.

काही व्यावसायिक वापरलेल्याच बाटल्यामध्ये नळाचे पाणी भरून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकत असतात. अनेक नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्याकडून या बाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणीविक्रेते ग्राहकांची लूट करतात. पाणीविक्रीचा व्यवसाय ग्रामीण भागातही वाढला आहे. पाण्याची शुद्धताही तपासली जात नाही. केवळ पाणी थंड आहे म्हणून ग्राहक ते विकत घेतात. कोणत्याही हॉटेल, पानटपरीवर आता एक लिटर पाण्याची बाटली जवळपास वीस रुपयांना मिळते. अनेक हॉटेलचालक स्वतः च्या पाण्याच्या बाटल्या विकत आहेत. त्यात अनेक शीतपेय निर्मिती कंपन्याही बाटलीबंद पाण्याची विक्री करताना दिसत आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने पॅक बंद, कालावधी, स्वच्छता, मुदत यावर लक्ष दिले पाहिजे. मात्र, अनेक कंपन्या पाण्याच्या बाटलीवर असा उल्लेख करीत नाही. अस्पष्ट किंवा वाचता येणार नाही अशा पद्धतीने लिहिलेले असते. बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात. याकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर एखाद्या दिवशी अशुद्ध पाणी पिण्यामुळे नागरिकाच्या आरोग्यावर परिणाम होईल.

सध्या बहुतेक नागरिक पिण्यासाठी पाणी म्हणून मोठ्या बाटल्या पाण्याच्या मागवत आहेत. ३० रुपये बाटली, थंड पाहिजे असेल तर ४० रुपयेप्रमाणे बाटली मिळत आहेत. ग्रामीण भागात हे पाणी कुठून आणले, कसे आणले हे न पाहता घेत आहेत. लग्न समारंभात तर सगळेच जण या पाण्याचा वापर करत आहेत. -आशिष चव्हाण, कासा

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

34 seconds ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

5 minutes ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

13 minutes ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

20 minutes ago

दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…

30 minutes ago

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

35 minutes ago