वसईत शाळेकडून फी वसुलीसाठी वकिलाकडून पालकांना नोटिसा

नालासोपारा (वार्ताहर) : वसईतील एका शाळेने शैक्षणिक फी वसुलीसाठी चक्क वकिलाकडून पालकांना नोटिसा बजावल्या आहेत. फी भरली नाहीतर मुलांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी या नोटिशीतून दिली आहे. यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


वसई पश्चिम एव्हर शाईन परिसरातील सेंट फ्रान्सिन हायस्कूलने कोरोना काळापासून शैक्षणिक देयक बाकी असलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना वकिलामार्फत नोटिस बजावल्या आहेत. देयक वसूल करण्यासाठी शाळेने हा नवा पायंडा पाडला आहे. या नोटिसीमध्ये शाळेने पालकांना चक्क दम दिला आहे. सात दिवसांच्या आत पैसे भरण्याचे सांगितले आहे. पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई करत मुलांना शाळेतून काढून टाकले जाईल आणि त्यासाठी पूर्णत: पालक जबाबदार असतील, असे सांगितले आहे.


यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाने माहिती दिली की, कोरोना काळापासून अनेक मुलांची वार्षिक शैक्षणिक देयक बाकी आहेत. कोरोना काळात शाळेने मुलांना विविध शैक्षणिक सुविधा दिल्या. त्यात ऑनलाईन वर्ग, परीक्षा तसेच शाळेच्या ॲप्लिकेशन वरून पूर्णवेळ शाळा घेतली. यामुळे शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च कसा काढायचा यामुळे जर पालकांनी पैसे नाही भरले तर शाळा कशी चालेल?. पालकांनी मात्र शाळेच्या विरोधात सूर लावत कोरोना काळ संपला असला तरी अनेक पालक त्याच्या आर्थिक परिणामातून सावरले नाहीत. यामुळे पालकांनी शाळेला देयकात सूट तसेच हप्त्याची मागणी केली. पण शाळेने एकही रुपया कमी केला नाही. आता वसुलीसाठी वकिलातर्फे नोटीस बजावून पालकांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरु आहे.


यासंदर्भात वसई शिक्षण विभागाला माहिती विचारली असता त्यांनी यासंदर्भात कोणतीही तक्रार आली नाही. शासनाकडून कोरोना काळात पालकांची आर्थिक स्थिती खालावल्याने सर्व शाळांना १५ टक्के वार्षिक शैक्षणिक देयकात सूट देण्याचे सांगितले होते. त्याचबरोबर कोणतीही सक्ती न करता देयक वसूल करण्याचे आदेश दिले होते. केवळ देयक भरले नाही म्हणून कोणत्याही मुलाला शाळेतून काढता येत नाही. यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.

Comments
Add Comment

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ