नालासोपारा (वार्ताहर) : वसईतील एका शाळेने शैक्षणिक फी वसुलीसाठी चक्क वकिलाकडून पालकांना नोटिसा बजावल्या आहेत. फी भरली नाहीतर मुलांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी या नोटिशीतून दिली आहे. यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसई पश्चिम एव्हर शाईन परिसरातील सेंट फ्रान्सिन हायस्कूलने कोरोना काळापासून शैक्षणिक देयक बाकी असलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना वकिलामार्फत नोटिस बजावल्या आहेत. देयक वसूल करण्यासाठी शाळेने हा नवा पायंडा पाडला आहे. या नोटिसीमध्ये शाळेने पालकांना चक्क दम दिला आहे. सात दिवसांच्या आत पैसे भरण्याचे सांगितले आहे. पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई करत मुलांना शाळेतून काढून टाकले जाईल आणि त्यासाठी पूर्णत: पालक जबाबदार असतील, असे सांगितले आहे.
यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाने माहिती दिली की, कोरोना काळापासून अनेक मुलांची वार्षिक शैक्षणिक देयक बाकी आहेत. कोरोना काळात शाळेने मुलांना विविध शैक्षणिक सुविधा दिल्या. त्यात ऑनलाईन वर्ग, परीक्षा तसेच शाळेच्या ॲप्लिकेशन वरून पूर्णवेळ शाळा घेतली. यामुळे शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च कसा काढायचा यामुळे जर पालकांनी पैसे नाही भरले तर शाळा कशी चालेल?. पालकांनी मात्र शाळेच्या विरोधात सूर लावत कोरोना काळ संपला असला तरी अनेक पालक त्याच्या आर्थिक परिणामातून सावरले नाहीत. यामुळे पालकांनी शाळेला देयकात सूट तसेच हप्त्याची मागणी केली. पण शाळेने एकही रुपया कमी केला नाही. आता वसुलीसाठी वकिलातर्फे नोटीस बजावून पालकांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरु आहे.
यासंदर्भात वसई शिक्षण विभागाला माहिती विचारली असता त्यांनी यासंदर्भात कोणतीही तक्रार आली नाही. शासनाकडून कोरोना काळात पालकांची आर्थिक स्थिती खालावल्याने सर्व शाळांना १५ टक्के वार्षिक शैक्षणिक देयकात सूट देण्याचे सांगितले होते. त्याचबरोबर कोणतीही सक्ती न करता देयक वसूल करण्याचे आदेश दिले होते. केवळ देयक भरले नाही म्हणून कोणत्याही मुलाला शाळेतून काढता येत नाही. यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…