पालिका निवडणूक २३६ प्रभागांवरच!

मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच मुंबई महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली असून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता होणारी महापालिका निवडणूक २३६ प्रभागांवर होणार हे स्पष्ट झाले आहे.


सन २०१७ मध्ये झालेली मुंबई महापालिकेची निवडणूक ही २२७ प्रभागानुसार झाली होती. मात्र यावर्षीच्या निवडणुकीसाठी मुंबईत प्रभाग रचना वाढवण्यात आली आहे. मुंबईत वाढलेल्या लोकसंख्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील ९ प्रभाग वाढवले होते. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आता पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणा शिवाय ही निवडणूक होणार आहे. तर ओबीसी शिवाय कशा पद्धतीने प्रभागांची रचना केली जाणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहेत.


मुंबई महापालिका क्षेत्र जितक्या विभाग रचनेत व्यापता येणार आहे त्यानुसार विचार करून प्रभाग ठरवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे आता राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण