पालिका निवडणूक २३६ प्रभागांवरच!

  40

मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच मुंबई महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली असून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता होणारी महापालिका निवडणूक २३६ प्रभागांवर होणार हे स्पष्ट झाले आहे.


सन २०१७ मध्ये झालेली मुंबई महापालिकेची निवडणूक ही २२७ प्रभागानुसार झाली होती. मात्र यावर्षीच्या निवडणुकीसाठी मुंबईत प्रभाग रचना वाढवण्यात आली आहे. मुंबईत वाढलेल्या लोकसंख्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील ९ प्रभाग वाढवले होते. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आता पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणा शिवाय ही निवडणूक होणार आहे. तर ओबीसी शिवाय कशा पद्धतीने प्रभागांची रचना केली जाणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहेत.


मुंबई महापालिका क्षेत्र जितक्या विभाग रचनेत व्यापता येणार आहे त्यानुसार विचार करून प्रभाग ठरवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे आता राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.