पालिका निवडणूक २३६ प्रभागांवरच!

  48

मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच मुंबई महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली असून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता होणारी महापालिका निवडणूक २३६ प्रभागांवर होणार हे स्पष्ट झाले आहे.


सन २०१७ मध्ये झालेली मुंबई महापालिकेची निवडणूक ही २२७ प्रभागानुसार झाली होती. मात्र यावर्षीच्या निवडणुकीसाठी मुंबईत प्रभाग रचना वाढवण्यात आली आहे. मुंबईत वाढलेल्या लोकसंख्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील ९ प्रभाग वाढवले होते. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आता पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणा शिवाय ही निवडणूक होणार आहे. तर ओबीसी शिवाय कशा पद्धतीने प्रभागांची रचना केली जाणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहेत.


मुंबई महापालिका क्षेत्र जितक्या विभाग रचनेत व्यापता येणार आहे त्यानुसार विचार करून प्रभाग ठरवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे आता राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना