उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या बीकेसी मैदानावर हनुमान चालिसा वाचू

मुंबई : राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केलाय. काल उद्धव ठाकरेंनी ज्या बीकेसी मैदानात सभा घेतली त्या मैदानात हनुमान चालिसा वाचून शुद्धीकरण करणार असे नवनीत राणा म्हणाल्या दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही औरंजेबसेना झालीय अशा शब्दात राणांनी टीकास्त्र टाकले आहे.


सध्या सोनिया गांधींचे निवासस्थान म्हणजेच १० जनपथ हीच शिवसेनेची मातोश्री झालीय अशा शब्दात राणांनी टोला हाणला आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर देखील टीका केली होती. राज ठाकरेंच्या वतीने देखील राणांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.


नवनीत राणा यांनी पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांची कालची सभा लाचार होती. त्यांनी त्यांच्याच वक्तव्यावरून पलटी घेतली. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काहीही बोलले नाहीत. रोजगाराबाबत कोणतीही घोषणा केली नाही.' हनुमान चालीसा पठण करणारे सध्या गायब झाले आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करावी, असे मुख्यमंत्र्याची मुंबईतील भाषणात बोलल्याचे सांगत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.


मुख्यमंत्री हनुमान चालीसेचा विरोध करतात, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्याची लाचारी स्पष्ट दिसतेय. गदा हाती न घेता मुख्यमंत्र्यीनी हनुमानाचा अपमान केला आहे, असेही नवनीत राणा यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी