हैदराबादला पराभवाची रसल

पुणे (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्मा आणि मारक्रम वगळता अन्य फलंदाजांना आलेले अपयश शनिवारी हैदराबादच्या पराभवाचे कारण ठरले. या सामन्यातील पराभवामुळे हैदराबादच्या पराभवांचा पंच (सलग पाच सामने गमाविले) झाला आहे. तसेच कोलकाताविरुद्धच्या पराभवामुळे हैदराबादची ‘प्ले-ऑफ’ प्रवेशाची अडचणही वाढली आहे. दरम्यान कोलकाताच्या विजयाने ‘प्ले-ऑफ’मधील रंगत वाढली आहे.


कोलकाताच्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना पार्टनरशीप करण्यात अपयश आले. त्यांची कोणतीच जोडी मैदानात थांबली नाही. त्यांच्या अभिषेक शर्मा आणि मारक्रम यांनी प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अन्य फलंदाजांनी साथ दिली नाही. अभिषेकने ४३ धावांचे योगदान दिले, तर मारक्रमने ३२ धावा केल्या. या दोघांना वगळता त्यांचे अन्य फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. केन विल्यमसन, राहुल त्रिपाठी, निकोलस पुरन या भरवशाच्या फलंदाजांनी नाराज केले. त्यामुळे हैदराबादला २० षटकांत १२३ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे कोलकाताने ५४ धावांनी सामना खिशात घातला.


कोलकाताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना चांगली सुरुवात करता आली नसली तरी खेळाडूंच्या सांघिक फलंदाजीमुळे त्यांना २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारता आली. आंद्रे रसलने तुफानी फलंदाजी करत २८ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या. त्यामुळे संघाला शेवटच्या षटकांत धावांचा वेग वाढवता आला.


सॅम बिलींग्स (३४ धावा), अजिंक्य रहाणे (२८ धावा) आणि नितीश राणा (२६ धावा) यांनी केलेल्या सांघिक फलंदाजीमुळे कोलकाताने १७७ धावा केल्या. हैदराबादचे उम्रान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि मार्को जानसेन यांनी लक्षवेधी गोलंदाजी केली. मलिकने ४ षटकांत ३३ धावा देत ३ बळी मिळवले. भुवनेश्वर, मार्कोने प्रत्येकी १ बळी मिळवला.

Comments
Add Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर