पालघर जिल्ह्यातील ८० बालकांच्या रक्तात सापडले हत्तीरोगाचे सुक्ष्मजीव

सफाळे (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यात अनेकानेक वर्षांपासून हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये राबविण्यात आलेल्या संक्रमण पडताळणी सर्वेक्षण मोहिमेत ६ ते ७ वर्ष वयोगटातील निवडक लहान मुलांच्या तपासणीत डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यात सर्वाधिक २९ बालके संक्रमित (हत्तीरोग दूषित) आढळून आली. २०१६ ते २०२२ या कालावधीतील विविध सर्वेक्षणात या तीन तालुक्यात १४७ व्यक्ती हत्तीरोग संक्रमित आढळून आल्या आहेत.


त्यासाठी तीन तालुक्यात २५ मे ते ५ जून या कालावधीत “सामुदायिक औषधोपचार मोहीम" राबविण्यात येणार आहे. बालकांचे भवितव्य हत्तीरोगमुक्त ठेवण्यासाठी मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्ध या सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे प्रत्यक्ष सेवन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील सभेत सांगितले. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


डहाणू, तलासरी व विक्रमगडमध्ये प्रादुर्भाव अधिक असल्याने या तालुक्यात पुढील दोन वर्ष सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी आवश्यक जनजागृतीसाठी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या असून २५ मे पासून सामुदायिक औषधोपचार मोहिमेल डहाणू, तलासरी व विक्रमगड तालुक्यातील नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष खाण्याचे आवाहन केले आहे.


हा आजार क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत होतो. सेप्टिक टँक, घाण, निचऱ्याच्या जागी व गटारे अशा दूषित पाण्याच्या जागी या डासांची पैदास होते. हातापायाला सूज किंवा हत्तीपायसारख्या विकृती डास चावल्यानंतर सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश झाल्यानंतर ५ ते १० वर्षांनंतर निर्माण होत असल्याने सुरुवातीच्या काळात व्यक्ती याबाबत अनभिज्ञ राहतात.

Comments
Add Comment

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना

एक हजार रुपयांच्या मोबदल्यात ६ वर्षाच्या बालकाला जुंपले कामाला !

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुलांचे बालमजुरीसाठी शोषण आजही सुरुच पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ६८ कोटींचा खर्च

विरार : वसई - विरार पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांच्या

नालासोपारा ड्रग्ज कारखाना प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

वसई : मुंबई पोलिसांनी कारवाई करत नालासोपारा येथे ड्रग्जचा अवैध ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईनंतर