दिल्ली जळीतकांडात २७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळीत इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीवर मध्यरात्रीनंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत एकूण २७ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.


पश्चिम दिल्ली परिसरातील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील सीसीटीव्ही तयार करणाऱ्या कंपनीच्या ३ मजली इमारतीला शुक्रवारी दुपारी ४.४० वाजता आग लागली. याची माहिती मिळतात अग्निशमन दलाचे २४ बंब तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. दिल्ली पोलिस, अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या संयुक्त प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दुपारी लागलेली आग पूर्णपणे विझवण्यात मध्यरात्री १ वाजता यश मिळाले.


याप्रकरणी पोलिसांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कंपनीच्या मालकांना अटक केली आहे. सदर इमारतीने फायर सेफ्टीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्रुटी ठेवल्याची चर्चा आहे.


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा