पंजाबचा बंगळूरुवर दणदणीत विजय

मुंबई (प्रतिनिधी) : जॉनी बेअरस्टो, लिआम लिविंगस्टोन यांची तुफानी फलंदाजी आणि त्याला मिळालेली कगिसो रबाडाची अप्रतिम गोलंदाजी या जोरावर पंजाबने बंगळूरुवर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या बंगळूरुला बरी सुरुवात मिळाली असली तरी २१० धावांचे डोंगराएवढे लक्ष्य पाहता धावांना गती देण्याच्या प्रयत्नात विराट कोहली, फाफ डु प्लेसीस एकामागोमाग बाद झाले. त्यानंतर महीपाल लोमरोरचाही संयम सुटला.


रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल या जोडीने बंगळूरुची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. या जोडीमुळे बंगळूरुच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. मात्र संघाच्या १०४ धावसंख्येवर हे दोन्ही फलंदाज बाद झाले. त्यामुळे बंगळूरु अडचणीत सापडला. त्यानंतर या संघाला संकटातून बाहेर पडणे जमलेच नाही. कगिसो रबाडाने ३ मोहरे टिपत बंगळूरुच्या धावगतीला वेग लावला. त्यामुळे बंगळूरुला २० षटकांत १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली.


तत्पूर्वी जॉनी बेअरस्टो आणि लिआम लिविंगस्टोन यांच्या धडाकेबाद खेळीमुळे पंजाबने २० षटकांत ९ फलंदाजांच्या बदल्यात २०९ धावांचे मोठे लक्ष्य उभारले. जॉनी बेअरस्टो आणि लिआम लिविंगस्टोन या दोघांनी बंगळूरुच्या गोलंदाजांना धु धु धुतले. बेअरस्टोने ४ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर २९ चेंडूंत ६६ धावांची मोठी खेळी केली. लिआम लिविंगस्टोनने ४२ चेंडूंत ७० धावा केल्या. त्यात त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. बंगळूरुच्या वानींदू हसरंगा डी सिल्वाने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत केवळ १५ धावा देत २ बळी मिळवले. हर्षल पटेलला बळी मिळवण्यात यश आले मात्र तो धावा रोखण्यात फारसा यशस्वी झाला नाही. पटेलने ४ षटकांत ३४ धावा देत ४ बळी मिळवले.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे