ठाण्यातील रस्ते कात टाकणार

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यातील रस्ते लवकरच कात टाकणार आहेत. राज्य नगरविकास विभागाने दिलेल्या अनुदानातून ठाणे शहरांतील १२७ रस्त्यांचा विकास करण्याचा महापालिकेचा मनोदय आहे.राज्याच्या नगरविकास विभागाकडून मिळालेल्या २१४ कोटींच्या अनुदानाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने रस्ते विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला असून या प्लॅनच्या माध्यमातून ठाणे शहरातील ५३ कि.मी रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये ८२.५९ कोटींचे डांबरी रस्ते, ९५.६२ कोटींचे यूटीडब्लूटी, तर ३५.७९ कोटींच्या डांबरी रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.


पावसाळा वगळून एका वर्षात या रस्त्यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने ठेवले असून या रस्ते विकासानंतर शहरातील प्रवास वेगवान होणार असून वाहतूक कोंडीपासून देखील दिलासा मिळणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.


ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून ठाण्यातील १२७ रस्त्यांसाठी सुमारे २१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीच्या माध्यमातून १२७ रस्त्यांचे युटीडब्लूटी, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या निधीचे सर्व प्रभागातील रस्त्यांचा समावेश करून त्यांची कामे करण्यात येणार आहे; परंतु दिवा-शिळ, नौपाडा-कोपरी या प्रभागांमध्ये सर्वाधिक निधी उपलब्ध केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून प्राप्त निधीच्या विनियोगामध्ये सत्ताधाऱ्यांचा सर्वाधिक समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे.


प्रभाग निहाय निधीचे वाटप करताना नौपाडा कोपरीला ४९ कोटी, माजिवडा-मानपाडा २४ कोटी, कळवा ८ कोटी, लोकमान्य, सावरकरनगर - २२ कोटी २६ लाख, वागळे इस्टेट - २६ कोटी, वर्तकनगर - १६ कोटी आणि मुंब्रा येथे ७ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या रस्ते विकासाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आता या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या