वॉर्नर-मार्श जोडीचा राजस्थानला धक्का

नवी मुंबई (प्रतिनिधी) : डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या ऑस्ट्रेलियाच्या जोडीने फलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत बुधवारी राजस्थानविरुद्ध दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्लीच्या विजयामुळे ‘प्ले-ऑफ’च्या रेसमधील रंगतही वाढली आहे. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या दिल्लीलाही चांगली सुरुवात करता आली नाही. डावाच्या दुसऱ्याच षटकात श्रीकर भरत भोपळाही न फोडता माघारी परतला. बोल्टने त्याचा अडथळा दूर केला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ही ऑस्ट्रेलियाची जोडी दिल्लीसाठी धाऊन आली. या जोडीने १४४ धावांची भागीदारी करत दिल्लीला विजयासमीप आणले. त्यात मार्शने आपले अर्धशतक झळकावले.


शतकाच्या उंबरठ्यावर (८९ धावांवर) असताना धावा आणि चेंडू यातील अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात मार्शने आपली विकेट गमावली. मात्र त्यानंतर वॉर्नर (नाबाद ५२ धावा) आणि रीषभ पंत या जोडीने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने हा सामना ८ विकेट आणि ११ चेंडू राखून जिंकला.


तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानला चांगली सुरुवात मिळाली नाही. चांगलाच फॉर्मात असलेला जोस बटलर स्वस्तात माघारी परतला. सकारीयाने शार्दुलकरवी झेलबाद करत बटलरच्या रुपाने दिल्लीला मोठा बळी मिळवून दिला. बटलरला अवघ्या ७ धावा करता आल्या. त्यानंतर संयमी खेळत असलेल्या यशस्वी जयस्वालचीही एकाग्रता नाहीशी झाली. जयस्वालने १९ चेंडूंत १९ धावांचे योगदान दिले. मार्शने जयस्वालचा अडथळा दूर केला. त्यामुळे ५२ धावांवर त्यांचे २ तगडे फलंदाज तंबूत परतले होते.


रवीचंद्रन अश्वीन आणि देवदत्त पडीक्कल या जोडीने फलंदाजीची सूत्रे हाती घेत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अश्वीनने ३८ चेंडूंत ५० धावा ठोकल्या, तर पडीक्कलने ३० चेंडूंत ४८ धावा चोपल्या. त्यामुळे २० षटकांअखेर राजस्थानला ६ फलंदाजांच्या बदल्यात १६० धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीच्या चेतन सकारीयाने राजस्थानविरुद्ध प्रभावित केले. त्याने ४ षटकांत अवघ्या २३ धावा देत २ बळी मिळवले.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या