मासेमारांच्या जाळ्यात गाभोळी मासे

ठाणे (प्रतिनिधी) : यंदा पाऊस लवकर असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, परंतु मासेमारी करणाऱ्या काही मासेमारांना यंदाच्या पावसाळ्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. मासेमारी करणारे समुद्राच्या जवळ असतात, निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने त्यांना निसर्गाची भाषा अवगत असते. त्यांच्या अंदाजानुसार लवकर पाऊस पडेल असे वातावरण असून गेले दोन दिवस ऊन-सावलीचा खेळ आणि अधूनमधून वारे वाहत आहेत.


भर दुपारच्या सुमारास जो पारा गेले आठवडाभर ४३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता, तो आता ४० अंश सेल्सियसच्या खाली आला आणि तापमान ३७ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. वातावरणात होत असलेले हे बदल पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.


यंदा पाऊस लवकर सुरू होईल असे भाकीत सर्वच जण वर्तवित आहेत. या पार्श्वभूमीवर अगदी निसर्गातील बहावा, गुलमोहर वृक्ष यांचा बहर नजरेत भरत आहे. तसेच नदीवर मासेमारी करणाऱ्या काही मासेमारांचे म्हणण्यानुसार नदीतील अरले, मळ्याच्या माशांच्या पोटात चक्क अंडी तयार झाल्याचे आढळून येत आहे. पाऊस जवळ आला की गाभोळी मासे जाळ्यात सापडायला सुरुवात होत असते.


भरपूर पाऊस आणि नदीला पाणी वाढले की, मासे गढूळ पाण्यात अंडी सोडतात. गाभोळी (अंडी भरलेले) वल्गनीचे मासे म्हणजे खवय्यांना खास मेजवाणीचा काळ असतो.

Comments
Add Comment

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प