उरण समुद्रकिनारी बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

उरण (वार्ताहर) : उरण तालुक्यातील माणकेश्वर समुद्रकिनारी बॉम्ब सदृश्य नळकांड्या सापडल्याने उरण परिसरामध्ये खळबळ माजली होती. तपासणीनंतर या कांड्या मोठ्या जहाजांवर सिग्नल देण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लायर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला.


उरणच्या माणकेश्वर समुद्र किनारी सकाळी १० च्या सुमारास किनाऱ्यावर खेळणाऱ्या मुलांना काही नाळकांड्या सापडल्या. या नळकांड्यांसोबत मुले खेळत असताना एक नळकांडी फुटल्याने या परिसरामध्ये बॉम्ब सदृश्य नळकांड्या सापडल्याची माहिती उरण, मोरा पोलीस ठाण्यास देण्यात आली. पोलिसांनी सदर घटनेची माहिती घेतली असता माणकेश्वर समुद्र किनारी अनेक नळकांड्या पडून असल्याचे लक्षात आले.


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नळकांडयांची तपासणी केली असता सदरच्या बॉम्ब सदृश्य नळकांड्या ह्या मोठ्या जहाजावरील सिग्नल फ्लायर असल्याचे स्पष्ट केले. यामुळे येथील परिसरामधील तणाव निवळला आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबत सदरच्या कांड्या ह्या येथील किनारी भागात आल्या असून, नागरिकांनी अशाप्रकारच्या वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आव्हान मोरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी केले आहे.


पिरवाडी ते माणकेश्वर हा मोठा समुद्रकिनारा असून, हा किनारा थेट अरबी समुद्राशी जोडलेला असल्याने, मोठ्या जहाजांमधून फेकण्यात येणाऱ्या वस्तू थेट येथील समुद्र किनारी येत असतात. काहीवेळा महत्वाच्या आणि किमती वस्तू या किनाऱ्यावर लागत आहेत. येथील रहिवासी देखील अशा वस्तू किनाऱ्यावर आढळल्या की त्या उचलण्यासाठी पुढे असतात. यातून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तरी अशा कोणत्याही वस्तुंना हात लावण्यापूर्वी तेथील जनतेने योग्य ती खबरदारी घेत नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जेणेकरून दुर्घटनेपासून बचाव करणे शक्य होईल.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार