नालेसफाईची जबाबदारी बाल कामगारांवर

भाईंदर (वार्ताहर) : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नसल्याची कारणे देत नालेसफाईच्या कामात बालकामगारांना जुंपणाऱ्या ठेकेदाराने यावर्षी सुद्धा शहराच्या नालेसफाईची जबाबदारी बाल कामगारांवर सोपविली आहे. बाल कामगार ठेवल्याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, त्यांची देयके तत्काळ रोखण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हरेश सुतार यांनी केली आहे. तरीसुद्धा महापालिका प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करत आहे.


मीरा-भाईंदर महानगरपालिकेने शहरातील नाल्यांची मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केलेला आहे. महापालिका क्षेत्रात ८५ पक्के नाले तर ७० कच्चे नाले असे १५५ नाले आहेत. नालेसफाईसाठी २ बोट पोकलन, २ हायड्रॉलीक पोकलन तसेच २ मोठ्या पोकलन या सामग्रीचा वापर तसेच रोज शेकडो मजुरांच्या साहाय्याने काम सुरू झाले आहे.


ठेका देताना महापालिकेने ठेकेदाराला काही अटीशर्ती ठेवल्या होत्या त्यानुसार बाल कामगारांना कामावर ठेवू नये तसेच नाल्यातून काढलेला कचरा, घाण रस्त्यावर न टाकता महापालिकेने निर्धारित केलेल्या जागीच टाकावे. असे असताना सुद्धा अनेक ठिकाणी बाल कामगार काम करत आहेत. बाल कामगारांना खोल गटारात उतरून त्यांच्याकडून धोकादायक कामे व इतर श्रमाची कामे करून घेतली जात आहेत. बाल कामगार ठेवल्याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, त्यांची देयके तत्काळ रोखण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हरेश सुतार यांनी केली आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये