भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली : भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे १५ मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील. राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेतील. १४ मे रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण होईल. विधी मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केले असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केले असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केले आहे.


राजीव कुमार यांनी २०२० साली निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांची अशोक लवासा यांच्या जागी नियुक्ती झाली होती. राजीव कुमार हे झारखंड कॅडरचे १९८४ बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. आता ते मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत. ते २०२५ मध्ये सेवानिवृत्त होतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुका देखील आता त्यांच्या नेतृत्वातच होतील.


https://twitter.com/KirenRijiju/status/1524653301924757504

निवडणूक आयुक्त पदासाठीचा कार्यकाळ हा सहा वर्षांसाठी असतो. किंवा वयाची अट ६५ वर्षांची असते.


राजीव कुमार यांचा जन्म १९६० सालचा आहे. राजीव कुमार यांनी ३६ हून अधिक वर्षे शासकीय सेवेत घालवली आहेत. त्यांनी केंद्र आणि बिहार-झारखंड राज्य कॅडरमध्ये विविध मंत्रालयाचे कामकाज सांभाळले आहे. ते २०२० साली केंद्रीय वित्त सचिव म्हणून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांची सार्वजनिक उद्यम चयन बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Comments
Add Comment

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर