भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली : भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे १५ मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील. राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेतील. १४ मे रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण होईल. विधी मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केले असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केले असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केले आहे.


राजीव कुमार यांनी २०२० साली निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांची अशोक लवासा यांच्या जागी नियुक्ती झाली होती. राजीव कुमार हे झारखंड कॅडरचे १९८४ बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. आता ते मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत. ते २०२५ मध्ये सेवानिवृत्त होतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुका देखील आता त्यांच्या नेतृत्वातच होतील.


https://twitter.com/KirenRijiju/status/1524653301924757504

निवडणूक आयुक्त पदासाठीचा कार्यकाळ हा सहा वर्षांसाठी असतो. किंवा वयाची अट ६५ वर्षांची असते.


राजीव कुमार यांचा जन्म १९६० सालचा आहे. राजीव कुमार यांनी ३६ हून अधिक वर्षे शासकीय सेवेत घालवली आहेत. त्यांनी केंद्र आणि बिहार-झारखंड राज्य कॅडरमध्ये विविध मंत्रालयाचे कामकाज सांभाळले आहे. ते २०२० साली केंद्रीय वित्त सचिव म्हणून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांची सार्वजनिक उद्यम चयन बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.