मुख्याध्यापकांवर कारवाईची टांगती तलवार

मुंबई (प्रतिनिधी) : शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा पास असणे बंधनकारक केले आहे. मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये टीईटी परीक्षा पास नसलेले अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना धडे देत आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांचे पगार थांबविण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते.


मात्र तरीसुद्धा अनेक शाळांमध्ये बिगर टीईटीधारक शिक्षक शाळांमध्ये शिकवतच आहेत. त्यामुळे वारंवार सांगूनही या शाळा निर्णय घेत नसल्यामुळे अशा शाळांमधील मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून शाळांना पत्र पाठविण्यात आले आहे.


बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी बंधनकारक आहे. जे शिक्षक टीईटी परीक्षा संदर्भातील निर्णय घेण्याआधी रुजू झाले आहेत अशा शिक्षकांनाही परीक्षा पास होण्यासाठी तीन संधी दिल्या होत्या. मात्र या तीन संधी मध्येसुद्धा जे शिक्षक पास झाले नाहीत अशा शिक्षकांची माहिती जमा करण्यात येत आहे.


ज्या शाळा टीईटी संदर्भातील अटी - नियमांचे पालन करत नाहीत आणि ज्या शिक्षकांनी टीईटी पास प्रमाणपत्र सादर केले नाही अशा शिक्षकांचे वेतन त्वरित थांबविण्यात यावे अन्यथा संबधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर विभाग कार्यालयाने दिले आहेत.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.