मुख्याध्यापकांवर कारवाईची टांगती तलवार

Share

मुंबई (प्रतिनिधी) : शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा पास असणे बंधनकारक केले आहे. मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये टीईटी परीक्षा पास नसलेले अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना धडे देत आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांचे पगार थांबविण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते.

मात्र तरीसुद्धा अनेक शाळांमध्ये बिगर टीईटीधारक शिक्षक शाळांमध्ये शिकवतच आहेत. त्यामुळे वारंवार सांगूनही या शाळा निर्णय घेत नसल्यामुळे अशा शाळांमधील मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून शाळांना पत्र पाठविण्यात आले आहे.

बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी बंधनकारक आहे. जे शिक्षक टीईटी परीक्षा संदर्भातील निर्णय घेण्याआधी रुजू झाले आहेत अशा शिक्षकांनाही परीक्षा पास होण्यासाठी तीन संधी दिल्या होत्या. मात्र या तीन संधी मध्येसुद्धा जे शिक्षक पास झाले नाहीत अशा शिक्षकांची माहिती जमा करण्यात येत आहे.

ज्या शाळा टीईटी संदर्भातील अटी – नियमांचे पालन करत नाहीत आणि ज्या शिक्षकांनी टीईटी पास प्रमाणपत्र सादर केले नाही अशा शिक्षकांचे वेतन त्वरित थांबविण्यात यावे अन्यथा संबधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर विभाग कार्यालयाने दिले आहेत.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

15 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

36 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago