मुख्याध्यापकांवर कारवाईची टांगती तलवार

  92

मुंबई (प्रतिनिधी) : शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा पास असणे बंधनकारक केले आहे. मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये टीईटी परीक्षा पास नसलेले अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना धडे देत आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांचे पगार थांबविण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते.


मात्र तरीसुद्धा अनेक शाळांमध्ये बिगर टीईटीधारक शिक्षक शाळांमध्ये शिकवतच आहेत. त्यामुळे वारंवार सांगूनही या शाळा निर्णय घेत नसल्यामुळे अशा शाळांमधील मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून शाळांना पत्र पाठविण्यात आले आहे.


बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी बंधनकारक आहे. जे शिक्षक टीईटी परीक्षा संदर्भातील निर्णय घेण्याआधी रुजू झाले आहेत अशा शिक्षकांनाही परीक्षा पास होण्यासाठी तीन संधी दिल्या होत्या. मात्र या तीन संधी मध्येसुद्धा जे शिक्षक पास झाले नाहीत अशा शिक्षकांची माहिती जमा करण्यात येत आहे.


ज्या शाळा टीईटी संदर्भातील अटी - नियमांचे पालन करत नाहीत आणि ज्या शिक्षकांनी टीईटी पास प्रमाणपत्र सादर केले नाही अशा शिक्षकांचे वेतन त्वरित थांबविण्यात यावे अन्यथा संबधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर विभाग कार्यालयाने दिले आहेत.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड