नऊ वर्षांनंतरही कुडूसची पाणीयोजना रखडलेली

  76

नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत


वसंत भोईर


वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला जुनी पाणीयोजना अपुरी पडत असल्याने २०१४ मध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. जानेवारी २०१४ मध्ये योजनेचे कामही सुरू झाले. मात्र या ना त्या कारणाने योजनेचे काम रखडले. तब्बल नऊ वर्षानंतरही या योजनेचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे आणखी किती काळ नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार, हे मात्र अनिश्चित आहे. महावितरण कंपनीकडे सदर पाणीयोजनेच्या विद्युत मीटरसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यासाठी पैसेही भरण्यात आले आहेत. विद्युत मीटर मिळताच पाणीयोजना सुरू करण्यात येईल, असे ठेकेदार संदेश बुटाला यांनी सांगितले.


कुडूस परिसरात डी प्लस झोनमुळे अनेक कारखाने आले आहेत. कारखानदारांमुळे येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. पूर्वी फक्त कुडूस हे छोटेसे गाव होते. जेमतेम सात ते आठ हजार लोकवस्ती होती. मात्र गेल्या काही वर्षात कुडूस गावासह पाच ते सहा उपनगरे वाढली. सतत वस्ती वाढत आहे. आजमितीला ३० ते ३५ हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. कूडूस, चिंचघर येथे मोठ्या शैक्षणिक संस्था असल्याने परिसरातील नागरिक चांगल्या शिक्षणासाठी मुलांचे कुडूस येथील शाळेत प्रवेश घेत असल्याने ते तेथेच वस्ती करतात. या कारणामुळे वाढत्या वस्तीला जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत होती.


उपनगरांना पाणीपुरवठा न झाल्याने येथील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाढत्या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन सरपंच कुमार जाबर व उपसरपंच मिलिंद चौधरी यांनी प्रयत्न करून ५ कोटी रुपये किंमतीची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. तिचे भूमिपूजन गाजावाजा करत तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.


१८ जानेवारी २०१४ साली या योजनेचे काम सुरू केले. योजनेच्या कामासाठी दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र पहिल्यांदा पाण्याची टाकी व जलशुद्धीकरणासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने काम रखडले होते. त्यानंतर पाईपलाईन निकृष्ट दर्जाची केली असल्याचा आरोप करीत योजनेचे काम थांबले होते.


लोकप्रतिनिधींना अपयश


कुडूस ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच मिलिंद चौधरी यांच्या कालावधीत ही पाणी योजना मंजूर झाली. तिचे काम सन २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर २०१६ ला त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपल्यानंतर २०१६ ला निवडणूक झाली. या निवडणुकीत चौधरी यांच्या गटाचा पराभव होऊन दुसऱ्या गटाची सत्ता आली. त्यानंतर २०२१ साली दुस-या गटाचाही कार्यकाळ संपला तरीही ही योजना पूर्ण करता आली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधीचे अपयश दिसून आले.


कुडूस पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत ही योजना सुरू करण्यात येईल. -अनिरुद्ध पाटील, ग्रामविकास अधिकारी, कुडूस

Comments
Add Comment

देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या मुलाला वाचवण्यात यश

शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार

पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी

दहीहंडी उत्सवासाठी एक खिडकी योजना

महानगरपालिका उतरविणार गोविंदा पथकांचा विमा विरार : दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना महानगरपालिकेतर्फे

मनपा क्षेत्रातील ११७ शाळा जिल्हा परिषदेकडेच !

आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष विरार : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ जिल्हा

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

न्यू इंग्लिश स्कूल सोनाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

वाडा : वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या दि.