भाईंदरमध्ये बांगलादेशीला अटक

मिरा रोड (वार्ताहर) : नवघर पोलिस ठाणे हद्दीत एक बांगलादेशी नागरिक विनापरवाना वास्तव्य करत असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


नवघर पोलीस ठाण्यातील दहशतवादविरोधी कक्षाला एक बांगलादेशी नागरिक भाईंदर पूर्वेला येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक गॅस गोडाऊन येथे गेले असता एक संशयित इसम त्यांना दिसला. त्याची चौकशी केली असता तो बांगलादेशी असल्याचे त्याने कबूल केले.


त्याचे नाव अब्दुल्ला वजेद गाजी (२४) असे असून तो बांगलादेशातून गरिबी, उपासमारी व बेरोजगारीला कंटाळून भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून पश्चिम बंगालमार्गे मुंबईत आला होता. तो गेल्या ६ महिन्यांपासून गणेश देवल नगर, भाईंदर पश्चिम येथे राहत आहे.


कंपन्यांमध्ये लेबर काम करून उदरनिर्वाह करत असल्याचे त्याने सांगितले. त्याने बांगलादेशी असल्याचे कबूल केले असून तो भारतीय असल्याचे कोणतेही कागदपत्र दाखवू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या