धोनीच्या टी२० क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण

मुंबई (प्रतिनिधी) : चेन्नईने रविवारी दिल्लीचा दारूण पराभव केला. तब्बल ९१ धावांनी चेन्नईने हा सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार म्हणून धोनीने टी२० क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी विराट कोहलीनेही कर्णधार म्हणून ६००० धावा केल्या आहेत.


धोनीने या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम नोंदवण्यासाठी धोनीला फक्त चार धावांची गरज होती. मात्र त्याने दिल्ली विरोधातील सामन्यात ८ चेंडूमध्ये चौकार आणि षटकार लगावत २१ धावा केल्या. याआधी हा विक्रम फक्त विराट कोहलीच्या नावावर होता. त्यानेदेखील टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधार असताना ६००० धावा केलेल्या आहेत.


दरम्यान, महेंद्रसिंह धोनी आणखी एक विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये तो ५००० धावांच्या कल्बमध्ये जाण्यापासून फक्त ९१ धावांनी दूर आहे. आगामी काही सामन्यांमध्ये तो ९१ धावा करण्यात यशस्वी झाला, तर त्याच्या आयपीएल क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण होतील. तो विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसेल.

Comments
Add Comment

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने