धोनीच्या टी२० क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण

मुंबई (प्रतिनिधी) : चेन्नईने रविवारी दिल्लीचा दारूण पराभव केला. तब्बल ९१ धावांनी चेन्नईने हा सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार म्हणून धोनीने टी२० क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी विराट कोहलीनेही कर्णधार म्हणून ६००० धावा केल्या आहेत.


धोनीने या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम नोंदवण्यासाठी धोनीला फक्त चार धावांची गरज होती. मात्र त्याने दिल्ली विरोधातील सामन्यात ८ चेंडूमध्ये चौकार आणि षटकार लगावत २१ धावा केल्या. याआधी हा विक्रम फक्त विराट कोहलीच्या नावावर होता. त्यानेदेखील टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधार असताना ६००० धावा केलेल्या आहेत.


दरम्यान, महेंद्रसिंह धोनी आणखी एक विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये तो ५००० धावांच्या कल्बमध्ये जाण्यापासून फक्त ९१ धावांनी दूर आहे. आगामी काही सामन्यांमध्ये तो ९१ धावा करण्यात यशस्वी झाला, तर त्याच्या आयपीएल क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण होतील. तो विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसेल.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून