तस्करीमुक्त देशासाठी आरपीएफचा एव्हीएसोबत सामंजस्य करार

मुंबई (प्रतिनिधी) : तस्करीमुक्त देशासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) असोसिएशन फॉर व्हॉलंटरी अॅक्शन (AVA) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. देश तस्करीमुक्त करण्याच्या समान ध्येयाने एकत्र काम करण्याच्या दृष्टिकोनातून, रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक संजय चंदर यांनी ८ एप्रिल २०२२ रोजी कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीत कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन (KSCF) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रजनी सिब्बल यांच्याशी तपशीलवार चर्चा केली.


शनिवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून चर्चा पुढे नेण्यात आली. ज्यामध्ये आरपीएफ आणि एव्हीए (ज्याला बचपन बचाओ आंदोलन म्हणूनही ओळखले जाते) यांनी माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी, मानवी तस्करीविरूद्ध काम करण्याकरिता रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी, संवेदनशीलता वाढवण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करणे आणि मानवी तस्करीची प्रकरणे ओळखण्यात आणि शोधण्यात एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र काम करण्याची प्रतिज्ञा केली.


सामंजस्य कराराच्या चौकटीत दोन्ही हितधारकांनी केलेली संयुक्त कृती आरपीएफने देशभरात सुरू केलेल्या "ऑपरेशन AAHT" (मानवी तस्करी विरुद्ध कारवाई)चे प्रमाण, व्याप्ती आणि परिणामकारकता निश्चितपणे वाढवेल. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत २०१८ पासून ५०,००० हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली असून रेल्वे मंत्रालय मुलांच्या सुटकेसाठी आणि इतर संबंधितांसोबत काम करण्यासाठी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार जबाबदारी पार पाडत आहे.

Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील