नेरळ स्थानकात अपघात रोखण्यासाठी बॅरिकेड्सची गरज

नेरळ (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कर्जत दिशेकडील नेरळ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला रूळ ओलांडून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यावेळी सातत्याने अपघात घडत असतात. याचा विचार करून मध्य रेल्वेकडून रूळ ओलांडत असताना होणाऱ्या घटना रोखण्यासाठी बॅरिकेट्स लावण्याची मागणी पुढे येत आहे.


कर्जत या उपनगरीय रेल्वे स्थानकात येण्यासाठी सातत्याने प्रवासी हे रूळ ओलांडत असतात आणि त्यामुळे सातत्याने अपघात होत असतात. या घटना सतत घडत असल्याने अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यात मध्य रेल्वे कामगारांचे नेते प्रवीण तांडेल यांनादेखील आपला जीव गमवावा लागला होता. तांडेल यांच्या अपघाती निधनानंतर नेरळ आणि परिसरातील जनतादेखील हळहळली होती. त्यात मागील काही महिन्यांत महाविद्यालयीन विद्यार्थीला आपले प्राण रेल्वे अपघातात गमवावे लागले आहे. नेरळ रेल्वे स्थानकात उतरून नेरळ विद्या मंदिर ही माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी जाणारे विद्यार्थी हे रूळ ओलांडून जात असतात. दुसरीकडे नेरळच्या पूर्वेकडील भागातील प्रवासी आणि नोकरदार तसेच विद्यार्थी हे दररोज रूळ ओलांडून ये-जा करीत असतात.


मध्य रेल्वे प्रशासनाने असे अपघाती प्रकार रोखण्यासाठी रूळ ओलांडून प्रवास करणारे प्रवासी आणि रहिवाशी यांच्यावर काही निर्बंध आणण्याची गरज आहे. त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ रेल्वे ५०० मीटर अंतर असे बॅरिकेट्स उभारावे, अशी मागणी होत आहे. या बॅरिकेट्समुळे नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वे अपघातात प्रवाशांचा बळी जाणार नाही. भिवपुरी रेल्वे स्थानकात रूळ ओलांडणारे प्रवासांचे बळी गेल्यानंतर मध्य रेल्वेकडून लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसे बॅरिकेट्स नेरळ आणि शेलू रेल्वे स्थानकात लावण्याची गरज आहे.

Comments
Add Comment

'या' दिवशी सुरू होणार नेरळ माथेरान मिनी ट्रेन

नेरळ : ब्रिटीश काळात १९०७ साली सर आदमजी पिरभाय यांनी माथेरानात मिनी ट्रेन सुरू केली. दरवर्षी १४ जून रोजी

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर