धरणातील पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी गढूळ

गौसखान पठाण


सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून थेट पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी अंबा नदीच्या पाण्यात अचानक चिखल व गाळ आल्याने पाणी प्रचंड गढूळ झाले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.


उन्हेरे येथील धरणातील चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी गढूळ झाले होते. चिखलामुळे अंबा नदीचे पाणी पूर्णपणे मातकट रंगाचे झाले होते. शिवाय असे गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांना आले. नळाद्वारे अचानक गढूळ पाणी आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.


याशिवाय अंबा दिला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प पालीत उपलब्ध नाही. तसेच तब्बल २० कोटींची शुद्धपाणी योजना देखील लालफितीत अडकलेली आहे.


परिणामी भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहिरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश जण विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरून देखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.


पाण्यात नगरपंचायतीद्वारे औषध टाकण्यात आले आहे. तसेच दोन-तीन दिवसांत गाळ खाली बसेल. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. - सुलतान बेनसेकर, पाणीपुरवठा सभापती


उन्हेरे धरणाची जॅकवेल व तेथील दरवाजाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हा दरवाजा उघडल्याने धरणातील गाळ पाण्यामार्फत नदीला मिळाला आहे. दोन दिवसात पाणी स्वच्छ होईल.


- राकेश धाकदतोडे, कार्यकारी अभियंता, कोलाड पाटबंधारे विभाग

Comments
Add Comment

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय उत्खनन?

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात सध्या सुरू असलेल्या बॉक्साइट उत्खननाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या

थंडीच्या कडाक्याने आंबा मोहरला

उत्पादनात २० टक्के वाढ अपेक्षित; बागायतदारांच्या आशा पल्लवित अलिबाग : कडाक्याच्या थंडीमुळे आंबा कलमांना मोहर

जिल्ह्यात दहा नगर परिषदांमध्ये धक्कादायक निकाल

प्रस्थापितांना मोठा दणका सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्यावर नगर

रोडपालीत शेकापचा ‘गड’ ढासळला

प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच

उरणच्या करंजा बंदराच्या कायापालटासाठी ७० कोटींची तरतूद

गाळाचा प्रश्न सुटणार, खासदार श्रीरंग बारणेंचा पाठपुरावा अलिबाग : उरण तालुक्यातील करंजा मच्छीमार बंदरात साचलेला

खोपोली नगर परिषदेत शिवसेनेचे वर्चस्व

नगराध्यक्षपदी कुलदीपक शेंडे; राष्ट्रवादी बॅकफूटवर खोपोली निवडणूक चित्र सुभाष म्हात्रे खोपोली : खोपोली नगर