शहापुरात प्लास्टिक बंदीची ऐशीतैशी

  181

शहापूर (वार्ताहर) : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केली असली तरी तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास स्थानिक प्रशासन अपयशी ठरत आहे. शहापूर तालुक्यात कचराभूमी व बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा खच पडलेला दिसत आहे. कचऱ्यामुळे पर्यावरणाला हानी आणि शहराला विद्रुप करण्याचे काम करते. प्लास्टिकचा कचरा नष्ट करणे शक्य नसल्याने दिवसेंदिवस ढीग वाढत चालले आहेत.


डम्पिंग ग्राऊंड, बाजारपेठांत कचऱ्याचा खच


प्लास्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि समुद्र, नद्यांचे प्रदूषण, त्यापासून उद्भवणाऱ्या समस्यांमुळे सरकारने प्लास्टिक बंदी केली होती. तसेच प्लास्टिक वापराविरुद्धही कारवाई जोमाने सुरू होईल आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंडही वसूल करण्यात येईल, अशी घोषणा केली होती; परंतु सहा-आठ महिन्यांतच घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या काळात अनेकांकडून प्लास्टिक पिशवी वापरल्याने प्रशासनाने दंड वसुली केली; परंतु सध्या यावर काही कारवाई होताना दिसत नाही. शहापूर तालुक्यात गावखेड्यांव्यतिरिक्त शहरी भागातही बाजारपेठांमध्ये सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत आहे. हजारो प्लास्टिक पिशव्या डम्पिंग ग्राऊड, गटारांमध्ये तसेच आठवडी बाजारात उघड्यावर पाहायला मिळत आहेत. यावरही स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती, नगरपंचायत कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.


आरोग्यासह पर्यावरणाला धोका


सरकारच्या या प्लास्टिक बंदीचा निर्णय आणि प्राथमिक स्वरूपात जनतेने स्वागत केले होते. त्यांचे असे म्हणणे आहे की, पर्यावरणातील वाढत्या अविघटनशील प्लास्टिकचा कचरा आणि त्यापासून होणाऱ्या निरनिराळ्या आजारांना या निर्णयामुळे आळा बसेल. तसेच प्लास्टिकमुळे जी पर्यावरणाची हानी होते तीसुद्धा काही प्रमाणात आटोक्यात येईल; परंतु प्रशासन या प्लास्टिक बंदीबाबत उदासीन असल्यामुळे शहरी भागातील डम्पिंग ग्राऊंडवर दररोज हजारे टन प्लास्टिक पिशव्यांचा खच पडत आहे. आता तरी प्रशासनाने गंभीर होऊन तालुक्यात प्लास्टिक बंदीची सक्तीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामुळे आरोग्यासह पर्यावरणाला धोका वाढला आहे.


शहापूर तालुक्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला आहे. छोट्या-छोट्या दुकानांपासून मोठमोठ्या दुकानांत प्लास्टिक पिशव्या सहज मिळतात. खरे तर प्रशासनाने विक्री आणि उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.


- विनायक वेखंडे, पर्यावरणप्रेमी

Comments
Add Comment

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

खाजगी, अनधिकृत शालेय वाहतूक टाळा: कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पालकांना आवाहन

ठाणे: पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही खासगी किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन

मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा होणार की नाही ?

मीरा-भाईंदर : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पण चर्चा सुरू आहे ती मीरा - भाईंदरमधील कायदा आणि

कल्याणमध्ये आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरुन वातावरण तापलं, शिवसेना - मनसे आमनेसाने

कल्याण : कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली.

पनवेल-कल्याण रेल्वे दिवामार्गे करण्याची गरज

डोंबिवली : पेण-पनवेल-कल्याण रेल्वे दिवा मार्गे सुरू करण्याची नितांत गरज आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर लाखो

केडीएमसी संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुविधांची दुर्दशा

कल्याण : टिटवाळा मांडा पश्चिमेतील मनपाच्या संत ज्ञानेश्वर शाळेचे गळके छप्पर पाहता, सोयी सुविधा अभावी शाळेची