आशियाई गेम्सवर कोरोनाचे सावट

मुंबई (वृत्तसंस्था) : चीनमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता सप्टेंबरमध्ये होणारी १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेने सांगितले की, आशियाई क्रीडा स्पर्धेची तारीख बदलली जाऊ शकते.


पुढील तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. आशियाई क्रीडा स्पर्धा १०ते २५ सप्टेंबर दरम्यान चीनच्या शिनजियांग प्रांतातील हांगझूसह पाच शहरांमध्ये होणार होत्या. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे नाव आणि चिन्ह कायम राहणार आहे या मल्टी-स्पोर्टिंग स्पर्धेत एकूण ४० क्रीडा प्रकारांतील ६१ स्पर्धा होणार होत्या. ज्यात ११,००० क्रीडापटू सामिल घेणार होते.


यामध्ये जलतरण, तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, घोडेस्वारी, तलवारबाजी, फुटबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी आणि ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या इतर खेळांचा समावेश आहे. तसेच यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर टी-२० चे पुनरागमनही होणार होते. भारताने १९९० वगळता प्रत्येक आशियाई क्रीडा स्पर्धेत किमान एक सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच वेळी, पदकतालिकेतील पहिल्या १० देशांमध्ये नेहमीच भारताचा समावेश होत राहिला आहे.


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत १३९ सुवर्ण, १७८ रौप्य आणि २९९ कांस्य पदके जिंकली आहेत.


चीनमध्ये कोरोनामुळे अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. २०२२ पॅरालिम्पिक आणि हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा देखील कठोर नियम आणि निर्बंधांसहित आयोजित करण्यात आल्या होत्या.

Comments
Add Comment

तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड

कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या

पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यरकडे?

रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार मुंबई  : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी

दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ‘पलटवार’

चंदिगड : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.