आशियाई गेम्सवर कोरोनाचे सावट

मुंबई (वृत्तसंस्था) : चीनमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता सप्टेंबरमध्ये होणारी १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेने सांगितले की, आशियाई क्रीडा स्पर्धेची तारीख बदलली जाऊ शकते.


पुढील तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. आशियाई क्रीडा स्पर्धा १०ते २५ सप्टेंबर दरम्यान चीनच्या शिनजियांग प्रांतातील हांगझूसह पाच शहरांमध्ये होणार होत्या. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे नाव आणि चिन्ह कायम राहणार आहे या मल्टी-स्पोर्टिंग स्पर्धेत एकूण ४० क्रीडा प्रकारांतील ६१ स्पर्धा होणार होत्या. ज्यात ११,००० क्रीडापटू सामिल घेणार होते.


यामध्ये जलतरण, तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, घोडेस्वारी, तलवारबाजी, फुटबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी आणि ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या इतर खेळांचा समावेश आहे. तसेच यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर टी-२० चे पुनरागमनही होणार होते. भारताने १९९० वगळता प्रत्येक आशियाई क्रीडा स्पर्धेत किमान एक सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच वेळी, पदकतालिकेतील पहिल्या १० देशांमध्ये नेहमीच भारताचा समावेश होत राहिला आहे.


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत १३९ सुवर्ण, १७८ रौप्य आणि २९९ कांस्य पदके जिंकली आहेत.


चीनमध्ये कोरोनामुळे अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. २०२२ पॅरालिम्पिक आणि हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा देखील कठोर नियम आणि निर्बंधांसहित आयोजित करण्यात आल्या होत्या.

Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या