मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर राज्यातील मशिदींना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले होते. पण हे आदेश न पाळल्याने आता मुंबईतील दोन मशिदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजांच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुंबईतील दोन मशिदींवर वांद्रे आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच पालन न केल्याचा आरोप या मशिदींवरील विश्वस्तांवर करण्यात आला आहे.
या मशिदींवर झालेली कारवाई ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचाच परिणाम आहे. एका धर्माला एक न्याय आणि दुसरा धर्माला वेगळा न्याय याविरोधातच राज ठाकरे यांनी आपल्या सभेत आवाज उठवला होता. त्यामुळे सरकारला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे सरकार आणि मुंबई पोलिसांचे आभार मानतो, असे मनसेचे पदाधिकारी गजानन काळे यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत गणपती, नवरात्री या हिंदू सणांच्या बाबतीत दुजाभाव करण्यात येऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते. मात्र आता राज ठाकरे यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर दोन धर्मांतील तेढ कमी होऊन हा प्रश्न सुटला असल्याचे देखील काळे यांनी सांगितले.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…