गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

मुंबई (प्रतिनिधी) : हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्स प्ले-ऑफच्या उंबरठ्यावर असून शुक्रवारी होणाऱ्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास ते प्लेऑफचे तिकीट निश्चित करतील. विक्रमी ५ वेळचा चॅम्पियन असलेला मुंबई संघ आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आयपीएलच्या १५व्या हंगामातील त्यांची मोहीम संपण्यापूर्वी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना आणखी काही विजय आपल्या खात्यात नक्कीच जोडायचे आहेत.


मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात हंगामातील पहिला विजय मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला. दुसरीकडे, अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स त्यांचा शेवटचा सामना पंजाब किंग्जकडून हरल्याने त्यांची पाच सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. पराभवानंतरही, गुजरात टायटन्स १० सामन्यांतून १६ गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे आणि शुक्रवारी विजय मिळवल्यास ते प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करणारा पहिला संघ बनतील. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा विचार केला तर ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असून स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पण गेल्या सामन्यात मुंबईला राजस्थानवर ५ गडी राखून मोसमातील पहिला विजय मिळाला. आता मुंबईला आपल्या या सामन्यात विजयाची घोडदौड कायम राखता येईल का? हे पाहावे लागेल.


सूर्यकुमार फलंदाजीत मुंबईचा स्टार खेळाडू आहे; परंतु भरवशाचे फलंदाज रोहित व ईशानचा खराब फॉर्म स्पर्धेत कायम आहे, तर धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्डला आतापर्यंत त्याच्या ‘फिनिशर’ भूमिकेला न्याय देता आलेला नाही. गोलंदाजीतही जसप्रीत बुमरा किफायतशीर असला तरी तो हवे तसे विकेट घेऊ शकला नाही. डॅनियल सॅम्स, रिले मेरिडिथ यांनी मधल्या काळात चांगली कामगिरी केली असली तरी मुंबईकडे बुमराशिवाय कोणताही विश्वसनीय गोलंदाज नाही. तर गुजरातकडे शमी, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ आणि रशीद या गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे सर्वात धोकादायक गोलंदाजी आक्रमण आहे.


मुंबई इंडियन्स करू शकते इतरांचा खेळ खराब


मुंबईसाठी प्ले-ऑफचे दरवाजे बंद आहेत; परंतु हा संघ आता स्वतःची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि उर्वरित सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स इतर संघांची समीकरणे बिघडवण्याचा प्रयत्न करेल. मुंबईकडे गमावण्यासारखे काहीही नसताना ते आता संघातील तरुण प्रतिभेला आजमावून पाहू शकतात. तसेच स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली असताना इतर संघांची डोकेदुखी वाढवू शकतात. अंतिम टॉप ४ कोण असतील? हे ठरवण्यासाठी या शेवटच्या टप्प्यात मुंबईची कामगिरी महत्त्वपूर्ण असेल. त्यामुळे गुजरातला हरवून नि उर्वरित सामने जिंकून मुंबई इतरांच्या प्ले-ऑफच्या आशा धूळीस मिळवू शकतो.


हार्दिकचा जुन्या मित्रांशी सामना


हार्दिकसाठी गुरुवारचा हा दिवस खूप भावनिक असेल. कारण, तो या दिवशी या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच आपली कारकिर्द घडवणाऱ्या संघाशी सामना करेल. हार्दिकने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली असून या मोसमात तो गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. यंदाच्या मोसमात मुंबई गुणतालिकेत अगदी तळाला आहे आणि अशा परिस्थितीत तालिकेत अव्वल असलेल्या आपल्या संघाला पुन्हा विजयी मार्गावर नेण्याचा हार्दिकचा प्रयत्न असेल.


ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम वेळ : रात्री ७.३० वाजता

Comments
Add Comment

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय

भारत - दक्षिण आफ्रिकेचा आज धर्मशालात महामुकाबला

मालिकेवरील वर्चस्वासाठी चुरस; १-१ बरोबरीमुळे महत्त्व मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२०

तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड

कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या