राज ठाकरेंना पुन्हा एक अजामीनपात्र वॉरंट जारी

  60

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात सांगली, शिराळा नंतर आता बीड जिल्ह्यातील परळी कोर्टानेही अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. मराठी पाट्यांसंदर्भात झालेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट जारी झाले असल्याचे समजते. या प्रकरणात आता गृहखाते अॅक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात गृहखाते कारवाई करेल अशी माहिती मिळत आहे.


२००८ साली मराठी पाट्या आणि मराठी भाषेवरून मनसेच्या वतीने परळी येथे आंदोलन करण्यात आले होते. परळी येथे त्यावेळी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला होता. याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवसांपूर्वी सांगलीतील शिराळा येथे राज ठाकरेंविरोधात एक आजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर आता पाठोपाठ परळी येथेही असेच वॉरंट जारी करण्यात आले आहे. याविषयी एक पत्र मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुंबई पोलिसही अॅक्शन मोडमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकार आणि मनसे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असल्याचे चित्र आहे. आता या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटणार का अशी चर्चा सुरु आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या